Pages

Friday, September 28, 2012

नासापर्यंत पोहोचलेली स्वीटी

गणेश सुरसे | Sep 21, 2012, 22:27PM IST
 आर्टिकल Print Comment

भारताला महाशक्ती बनविण्याच्या मिशन-2020मध्ये आपलंही काही योगदान असावं, अशा विचाराने भारावलेल्या स्वीटी पाटेने जळगावचा झेंडा थेट नासात रोवला आहे. मूळची चाळीसगाव येथील स्वीटी लहानपणापासूनच गणित आणि विज्ञान या विषयांत अत्यंत तल्लख होती. तिच्या याच गुणामुळे परिवाराने तिला विज्ञान क्षेत्रात प्रगती करण्यासाठी कोटा येथे पाठविले.
बारावीपर्यंतचे शिक्षण कोटा येथे पूर्ण केल्यानंतर तिने चेन्नईच्या एसआरएम विद्यापीठात प्रवेश घेण्याचे निश्चित केले.

 स्त्रीचा सर्वाधिक अपमान; भारताचा  क्रमांक १९ वा

भारतात महिलांना देण्यात येणारा दर्जा हा नेहमीच वादाचा विषय असतो. पण, विषयावर अभ्यास करून बोलणारे कमीच! लंडनमधल्या थॉमसन रॉयटर्स प्रतिष्ठाननं याच विषयावर जगातील काही विकसित आणि विकसनशील अशा १९ देशांतील महिलांच्या स्थितीबद्दल एक सर्वेक्षण केलंय. यामध्ये भारताचा  क्रमांक आहे  १९वा... म्हणजेच सर्वात शेवटचा...
या सर्वेक्षणानुसार, देशातील महिलांची स्थिती ही सौदी अरेबियापेक्षा वाईट आहे. महिलांवरच्या लैंगिक अत्याचारामध्ये तर भारतानं पहिला नंबर मिळवलाय. भारत, ब्राझील, सौदी अरेबिया, मेक्सिको, इंडोनेशिया यांसहित १९ देशांचा या अभ्यासात  समावेश  करण्यात आला. शिक्षण, आरोग्य, रोजगार, अत्याचार इत्यादी विषयांवर या १९ देशांमधल्या महिलांची तुलना करण्यात आली. या अभ्यासासाठी ३७० तज्ज्ञांची मदत घेण्यात आली.

महिलांना दिलासा देणारा नवा कायदा

किरण मोघे | Sep 24, 2012, 00:19AM IST
मुंबई शहरात वित्तीय जगाशी संबंधित एका प्रख्यात बहुराष्ट्रीय कंपनीमधील संचालक पदावर असलेल्या स्त्रीने असभ्य वर्तन करणा-या सहकारी पुरुषाच्या विरोधात  तक्रार केली, तर तिच्या वरिष्ठांनी तिचे काम ‘असमाधानकारक’ असल्याचा अहवाल देऊन तिची पदोन्नती रोखली. तिला चक्क कामावरून काढून टाकले. राष्ट्रीय आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे गेली सहा वर्षे तिची तक्रार प्रलंबित आहे. दरम्यान, मुंबईतील एका प्रतिष्ठित इंग्रजी दैनिकातून तिच्याबद्दल नावानिशी बदनामीकारक मजकूर छापून आला, इंटरनेटवरून तिची अतिशय गलिच्छ शब्दांत निंदानालस्ती केली गेली. परिणामी तिच्या करिअरवर विपरीत परिणाम झाला. अर्थात, हे प्र्रकरण अपवादात्मक नाही. आज आपल्या देशात अशा अनेक महिलांनी कामाच्या ठिकाणी झालेल्या लैंगिक छळाच्या विरोधात आवाज उठवण्याचे धाडस दाखवले; परंतु त्यांना बदनामी, अवहेलना, निराशा आणि असुरक्षिततेपलीकडे  काही मिळाले नाही. आणि त्यांच्यापेक्षा कैकपट अशा स्त्रिया आहेत की ज्यांनी नोकरी गमावण्याच्या भीतीपोटी, घरची मंडळी त्यांच्याबद्दल अविश्वास दाखवतील म्हणून, किंवा त्यांचीच बदनामी होईल म्हणून गप्प बसून हा त्रास सहन केला आणि आजही करत आहेत. म्हणूनच लोकसभेत विनाचर्चा मंजूर झालेला ‘कार्यालयीन लैंगिक छळविरोधी संरक्षण कायदा’ अशा असंख्य महिलांना काही प्रमाणात दिलासा देणारा ठरेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.




पर्यावरण संरक्षण जागृती करणारी ‘वृक्षमाता’



वंगारी मथाई यांची 25 सप्टेंबर 2012 ही पहिली पुण्यतिथी आहे. कोण या वंगारी मथाई? त्यांचे कार्य काय? असे प्रश्न पडले असतीलच. वंगारी मथाई या काही साध्यासुध्या व्यक्ती नव्हत्या, तर नोबेल पारितोषिक विजेत्या पहिल्या आफ्रिकन स्त्री होत्या. त्या एक केनियन पर्यावरणवादी, सामाजिक कार्यकर्त्या होत्या. पर्यावरण, महिलांचे अधिकार आणि स्वच्छ प्रशासन यावर त्यांचा भर होता. मथाई यांनी सामाजिक चळवळीबरोबरच पर्यावरण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.

पर्यावरण, वृक्ष याबाबत ठामपणे भूमिका मांडणा-या या वंगारी मथाई यांचा जन्म केनियातील नैरी येथे 1940 मध्ये झाला. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण येथील स्थानिक शाळेमध्येच झाले. स्लोलास्टिका येथील महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण झाले. त्यानंतर पिट्सबर्ग विद्यापीठामध्येही त्यांनी काही धडे घेतले. मात्र पुन्हा त्या केनियाच्या नैरोबी विद्यापीठात संशोधन सहायक म्हणून आल्या. बायोलॉजी सायन्समध्ये पीएच. डी. करणा-या त्या आफ्रिकेतल्या पहिल्याच महिला होत्या.

1970 च्या दशकात हरितपट्टा (ग्रीन बेल्ट) आंदोलनाची मुळे रोवून त्यांनी पर्यावरण संरक्षणाकडे सर्वांचे लक्ष वेधले. कधीकाळी घरामागील हिरवागार दिसणारा डोंगर आता व्यापारी हेतूने झालेल्या प्रचंड मोठ्या प्रमाणातल्या जंगलतोडीमुळे ओसाड पडला आहे. जमिनीची धूप, पाण्याचे प्रदूषण झाले आहे. स्थानिक लोकांना या प्रचंड समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जंगलापासून मिळणारे उत्पन्न आता थांबले, तसेच महिलांना जळणाच्या लाकडासाठी वणवण फिरावे लागत आहे. या समस्या त्यांच्या डोळ्यासमोर फिरत होत्या. त्या प्रचंड अस्वस्थ झाल्या. या प्रश्नाबाबत काहीतरी केले पाहिजे, असे त्यांना वाटू लागले. त्यांनी या विषयावर सखोल अभ्यास केला आणि वृक्षतोडीवर वृक्ष लागवड हेच एक उत्तर त्यांच्यापुढे आले .  

Wednesday, September 26, 2012

   आदिवासी हे सर्व विश्वाचेच मूलाधार   


  • आदिवासी जमात' हे वर्णन ज्या ज्या लोकसमूहांना लावण्यात येते. त्या सर्व जमाती आधुनिक काळात, आधुनिकतेची विविध साधने उपयोगात आणीत जगत आहेत. आधुनिक स्वरूपाचे परिवर्तन या जमातीत होताना दिसते. या सर्व गोष्टी विचारात घेता,`आदिमता 
  • म्हणजे मानवी जीवनाची प्राचीनतम निसर्गाश्रयी जीवनावस्था' असे मान्य केले तर मानवी जीवनाची ही प्राचीनतम निसर्गाश्रयी जीवनावस्था अवशेषात्मकतेने ज्या समूह जीवनात प्रकटने तसेच वांशिकदृष्टय़ा पृथक (वेगळे) अस्तित्व ज्या समूहाचे जाणवते. त्या समूहांना आदिम असे म्हणता येईल.
  • आदिवासी हे सर्व विश्वाचेच मूलाधार आहेत. अगदी प्राचीनातील प्राचीन संस्कृती या आदिम संस्कृतीतूनच निर्माण झालेल्या आहेत. निसर्गाचा सहज आणि वैखिक आविष्कार आदिम जीवनात झालेला दिसतो, म्हणून तर भूतमात्रांशी जिव्हाळा आणि त्यांच्याशी अतूट नाते राखत जीवन जगायचे असते, हे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळालेले असते. आदिवासी हे सांस्कृतिकदृष्टय़ा नागर समाजापेक्षा प्रगत आहेत. माणुसकी, सहकार्याची भावना, त्रियांना समान वागणूक या गोष्टी आदिवासी समाजातच दिसतात. म्हणूनच सांस्कृतिकदृष्टय़ा आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज नाही, उलट आदिवासी संस्कृतीही सर्व जगाला आदर्शभूत ठरणारी आहे. कुसूम  अलाम आपल्या कवितेत म्हणतात-
  • `माणसाला माणूसपण बहाल करण्याची शक्ती 
  • आदिम संस्कृतीचा मूलत्रोत आहे'
  • वर्षानुवर्षे आदिवासी निसर्ग सान्निध्यात, दर्याखोर्यात, जंगलात, अतिदुर्गम भागात राहात असल्यामुळे भौतिक सुविधा त्याच्यापर्यंत तितक्या झपाटय़ाने पोहोचू शकल्या नाहीत. आज एका बाजूला देशाने विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगाने प्रगती केली आहे. जागतिकीकरणामुळे देशादेशांच्या सीमा एकमेकांना जोडल्या गेल्या आहेत, पण दुसर्या बाजूने देशाला स्वातंत्र्य मिळून 62वर्षे पूर्ण होऊनही आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज, सरकारी योजना या भौतिक सुविधा आदिवासींपर्यंत पोहोचलेल्या दिसत नाहीत. दुर्गम भागात राहात असल्यामुळे आदिम समाज नागर समाजापासून दूर राहिला. भौतिक परिवर्तनापासून हा समाज वंचित राहिला, म्हणूनच आदिवासी समाज मागासलेला आहे, तो भौतिक दृष्टीने, सांस्कृतिक दृष्टीने मात्र तो विश्वाला दिशादर्शक ठरणारा आहे.

Monday, September 24, 2012

आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भीमाबाई होळकर!

जागतीक पातळीच्या इतिहाससंशोधकांनी आद्य महिला स्वातंत्र्य सेनानीचा सन्मान दिलेल्या भीमाबाई होळकरांना आमच्या इतिहासाने मात्र काळाच्या कालकुपीत दफन करुन ठेवले आहे, हे एक दुर्दैवच आहे. आज जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने अठराव्या शतकात शिक्षित असलेली, परंपरेच्या जोखडाखाली न वाढवली गेलेली, पिता यशवंतराव होळकरांच्या पावलावर पाउल ठेवत ब्रिटिशांशी सर्वकश युद्ध पुकारणारी ही महान वीरांगना.
भीमाबाईंचा जन्म १७९७ मद्धे पुणे येथे झाला. आईचे नांव लाडाबाई तर पिता भारताचे इंग्रजांचे कर्दनकाळ, आद्य स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव होळकर. दौलतराव शिंदेंनी सत्तालालसेमुळे मल्हारराव होळकर (दुसरे) यांचा पुण्यात खुन केला. यशवंतराव व विठोजींच्याही जीवावर शिंदे उठल्याने उभयतांना पुण्यातुन निसटुन जावे लागले. शिंद्यांनी त्याचा सुड असा घेतला कि नवजात भीमाबाई आणि माता लाडाबाईला कैदेत टाकले. त्यांची सुटका यशवंतरावांनी २५ आक्टोबर १८०२ रोजी पुण्यावर स्वारी करुन शिंदे व पेशव्यांचा दणदणित पराभव केल्यानंतर झाली. तब्बल सहा वर्ष या वीरांगनेला मातेसह कैदेत रहावे लागले.
महिलांच्या सशक्तीकरणाशिवाय 
सर्वोत्कृष्ट देशाची कल्पना अशक्य !
 
दरवर्षी ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. म्हणजेच समाजाने महिलांसाठी सर्मपित केलेला एक दिवस. या दिवशी महिलांचा विकास, त्यांचे सशक्तीकरण या विषयांवर अनेक चर्चा होतात, त्यांच्या विकासासाठी मोठया-मोठया घोषणा होत असतात. परंतु या सगळया प्रयत्नांनंतरही महिलांच्या परिस्थिती मध्ये सुधारणा होत नाही. यासाठी महिलांनीच त्यांचे सामाजिक आणि आर्थिक स्तरावर सशक्तीकरण कसे होईल ते पाहिले पाहिजे.       
आपल्या कुंभार समाजातील महिला वर्षानुवर्ष घरच्या कुंभार उद्योगात सहकारी म्हणुन काम करीत आहेत. ही अभिमानाची बाब आहे की, त्यांच्या सहकार्यामुळेच अनेक वर्ष कुंभार कारागीर आपला व्यवसाय करीत आहेत.सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबात घरातील स्त्रीच कुटुंबाचा गाडा हाकत असते. मुला-बाळांचे संगोपन, वृध्द मंडळींची देखभाल, घरातील कर्त्या पुरूषांच्यामागे (पती) खंबीरपणे उभे राहणे व महत्वाच्या बाबीत निर्णय घेणे. ही कामे प्रामुख्याने स्त्रीयांनाच करावी लागतात. तरी देखील तिच्या कार्याला नगण्य समजले जाते. म्हणुन आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या महिलांना स्वतः सजग राहण्याची गरज आहे. जितक्या मोठया संख्येने महिला आत्मनिर्भर होतील, रोजगार किंवा नोकरी करतील तितक्याच त्या शक्तीशाली होतील. या दिशेने आपण जे पाऊल टाकले आहे, त्यात प्रामुख्याने "महिला बचत गट' हा मुख्य मार्ग समोर आहे. ज्यामुळे महिलांना रोजगार व सन्मान मिळण्यास पर्यायाने त्यांचे सशक्तीकरण होण्यास निश्चितच मदत मिळेल.

Thursday, September 20, 2012


अगतिक स्त्रीच्या अस्तित्वाचाच प्रश्न  

जयमती दळवी , 

सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आपल्या स्वरूपसुंदर शरीराचा शेवट करून घेणाऱ्या नजमाची बातमी वाचली. विविध वर्तमानपत्रांतून या घटनेवर आलेले लेख वाचले आणि मन विषण्ण झाले. ही घटना खरी तर १९७७ सालची; पण आजही ती विषण्णता कमी न होता त्यात भरच पडते आहे. अशा अनेक नजमांचा शेवट थोडय़ाफार फरकाने असाच होत आलेला आहे.. होतो आहे.. आणि असाच पुढेही होत राहणार का? देहविक्रयाच्या नरकातून त्यांची कधीच सुटका होणार नाही का? त्यांना नरकात ढकलणारे दोषी की नरकात पडणाऱ्या त्या स्वत:च दोषी, हे आपण सोफ्यावर बसून आरामात बातम्या वाचणाऱ्या वाचकांनी का ठरवावे? हक्क तरी आहे का आपला? ‘वेश्या’ हा शब्दही तोंडातून काढणे म्हणजे तोंड विटाळून घेणे असे आपल्यातले काही महाभाग समजतात. ‘त्या तसल्या बायका’ असा त्यांचा (कधी केलाच तर) तिरस्कारयुक्त उल्लेख ते करतात. इतकी त्यांना या व्यवसायाबद्दल घृणा वाटते. त्याला व्यवसाय म्हणावे का, हीसुद्धा एक शंका! पण मालाच्या विक्रीबद्दल पैसे घेऊन उदरभरणासाठी केलेला तोही एक व्यवसायच!

मातृत्वाचं मोल 

फादर फ्रान्सिस दिब्रिटो

तिच्या श्रद्धेच्या सत्त्वपरीक्षेचा क्षण होता तो. तो तडफडत होता, विव्हळत होता. पाण्याच्या थेंबासाठी आसुसला होता. तिच्या काळजाचं पाणी पाणी होत होतं. अखेरच्या घटका मोजणाऱ्या आपल्या तृषार्त पुत्राला ती थेंबभर पाणीही देऊ शकत नव्हती. किती क्रूर असते नियती. उरात दूध आणि डोळ्यांत अश्रू...हेच मातृत्वाचं फलित असतं, हे तिला जाणवलं! या जगाचा निरोप घेताना, त्यानं तिला विश्‍वाची माता केलं. ज्यांना आईच्या मांडीचं कधी सुख मिळालं नाही, त्यांना त्यानं माउलीच्या पदरात टाकलं! 
--------


मरिया 15-16 वर्षांची एक किशोरी. तरी ध्यानाच्या कलेत पारंगत. ती ध्यानमग्न असताना तिला दैवी साक्षात्कार झाला. देवाचा दूत तिच्या पुढ्यात उभा राहिला. त्या दैवी दर्शनानं ती शहारली. तो तिला म्हणाला, ""हे कृपापूर्ण स्त्रिये, कल्याण असो. प्रभू तुझ्याबरोबर असो.'' या जगावेगळ्या अभिवादनानं ती गोंधळात पडली. तिला आधार देत देवदूत म्हणाला, ""मरिये, भिऊ नकोस. तुझ्यावर देवाचा कृपाप्रसाद झाला आहे. तू गर्भवती होशील...तुला पुत्र होईल...'' 
""मी तर कुमारिका आहे. माझं लग्न ठरलं आहे; परंतु झालेलं नाही...हे कसं शक्‍य आहे?'' 
मरियेनं नम्रतेनं विचारलं, ""त्याची चिंता तू करू नकोस. तुला देवाचा अनुग्रह होऊन तुझ्या उदरी देवपुत्र जन्म घेईल...देवाला काहीच अशक्‍य नाही... 

""जशी देवाची इच्छा..'' मरिया उद्गारली. 
""तथास्तु'' असं बोलून देवदूत अंतर्धान पावला. 
मरिया ध्यानातून बाहेर आली...कौमार्यावस्थेत बाळाची चाहूल लागणं समाजाला बिलकूल मान्य नव्हतं. अशा स्त्रीसाठी धर्म-कायद्यानं धोंडमाराची शिक्षा निश्‍चित केली होती. 
।। जिजाऊसाहेब ।।

इंद्रजित सावंत
Sunday, May 13, 2012 AT 03:15 AM (IST)

माता असावी तर जिजाऊसाहेबांसारखी, असं सार्थ अभिमानानं म्हटलं जातं. मोठ्या जिद्दीनं जिजामातेनं पुत्र शिवबाची जडणघडण केली... पुढं शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामागं खरी प्रेरणा होती ती जिजाऊसाहेबांचीच... 

"जिजिआऊ वालिदा-द-राजा शिवाजी' म्हणजे राजा शिवाजींची माता "जिजाऊ' ही राजमाता जिजाऊसाहेबांची मुद्रा आहे. जिजाऊसाहेबांच्या सदरेवरून सुटणाऱ्या आज्ञापत्रांच्या माथ्यावर दिमाखात ही मुद्रा उमटवली जात असे. होय स्वतंत्र मुद्रा! तीही एका स्त्रीची! हे शिवकाळात एक आश्‍चर्यच होतं. ज्या काळात स्त्रियांना काहीच अधिकार नव्हते, त्या काळात शिवाजीराजांची ही माता आपली मुद्रा वापरत होती. एवढंच नव्हे तर, राजसदरेवर बसून न्यायनिवाडेही करीत असे. जिजाऊसाहेबांनी दिलेली न्यायनिवाड्याची काही पत्रंही आज उपलब्ध आहेत त्यावर उमटवलेल्या त्यांच्या मुद्रेसह. जिजाऊंनी दिलेला निर्णय पुत्र शिवबा तर मानत असेच; शिवाय सर्व गोतसभाही एकमुखानं हा जिजाऊंचा निर्णय मानत असे. 

हे तर महिला दुर्बलीकरणच!

अंतरा देव सेन

सरकारने आणखी एक चूक केली आहे. त्याने एक विचित्र वाटणारा प्रस्ताव मांडला आहे. आता हाऊसवाईफ या नात्याने घरातील कामे करणार्‍या पत्नीला त्या कामासाठी वेतन देण्याची पाळी त्यांच्या पतीराजांवर येणार आहे.'पण हे काही वेतन म्हणता येणार नाही', असा खुलासा महिला व बालकल्याण मंत्री कृष्णा तीरथ यांनी केला आहे.'तुम्ही त्याला वेतन म्हणू नका. त्याची संभावना मानधन किंवा अन्यप्रकारे करता येईल.' पण या खुलाशावरून मंत्रिमहोदयांची अस्वस्थता उघड झाली आहे. स्त्री ही गृहलक्ष्मी असते. ती तिच्या पतीची हृदयस्वामिनी असते. तिच्या मुलांसाठी ती सुपरवूमन जशी असते, तसेच सुख देणारी परीसुद्धा असते. ती तिच्या सासूच्या आ™ोत राहणारी कर्तव्यदक्ष सून असते. तसेच घरात आणि बाहेरसुद्धा स्वत:चा वचक निर्माण करणारी मेमसाबदेखील असते. तिला सरकार आता घरेलू कामगाराचे रूप देणार आहे का? ती निव्वळ वेतन घेऊन काम करणारी कर्मचारी ठरणार आहे का?

Friday, September 14, 2012

नव-याच्या पगारातील वाटा गृहिणींना


image 
फक्त घर सांभाळणा-या गृहिणींना त्यांच्या नव-याच्या पगारातील काही टक्के हिस्सा मिळणार आहे.


नवी दिल्ली -  गृहिणींसाठी एक खुशखबर...फक्त चूल आणि मूल सांभाळणा-या प्रत्येक गृहिणीला तिच्या नव-याच्या प्रत्येक महिन्याच्या पगारातील काही टक्के रक्कम त्यांच्या खात्यातही जमा होणार आहे. सरकार या प्रस्तावावर विचार करत आहे.
आम्ही याबाबत एक सर्वे केला आहे. गृहिणींना काय करतेस’  असा प्रश्न विचारल्यास त्यांचं उत्तर काहीच नाही असं असते. त्यामुळे त्यांचा कुटुंबातील महत्वाचा सहभाग लक्षात घेऊन त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे असं महिला आणि बालकल्याण मंत्री कृष्णा तिरथ यांनी सांगितले.

Wednesday, September 12, 2012

परिवर्तनावर विश्वास असलेली ‘लक्ष्मी


परिवर्तनावर विश्वास असलेली ‘लक्ष्मी

किरण मोघे | Jul 25, 2012, 02:42AM IST

 

23 जुलै रोजी सकाळीच दूरचित्रवाणीवर कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या दु:खद निधनाची बातमी बघताना मन खिन्न झाले. जनवादी महिला संघटना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची एक कार्यकर्ती या नात्याने त्यांच्या सहवासात घालवलेल्या अनेक क्षणांच्या आठवणी उजळून आल्या. 
हस्तांदोलनाच्या त्यांच्या कोमल स्पर्शातून, प्रेमळ आवाजातून त्या आम्हा सामान्य कार्यकर्त्यांना आपलेसे करून घेत; पण कोणत्याही प्रकारच्या अन्याय-अत्याचाराला मात्र अतिशय कणखरपणे प्रखर विरोध करत असत. 2010मध्ये कानपूर येथे संघटनेचे 10वे राष्ट्रीय अधिवेशन झाले तेव्हा आपल्या उद्घाटनाच्या संदेशात सर्व प्रतिनिधींना ‘रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत अन्यायाविरुद्ध लढत राहा’, असे आवाहन त्यांनी केले, तेव्हा सभागृहात प्रचंड स्फूर्तिदायक आणि रोमांचकारी झालेले वातावरण अजूनही मला आठवते. 
कॅप्टन लक्ष्मी यांचा जन्म मद्रास (चेन्नई) येथे 24 ऑक्टोबर 1914 रोजी झाला. त्यांचे वडील एस. स्वामीनाथन हे मद्रास उच्च न्यायालयाचे प्रख्यात वकील होते, तर त्यांची आई अम्मूकुट्टी या महिलांच्या हक्कांसाठी लढणा-या समाजसेविका आणि स्वातंत्र्यसेनानी होत्या. अशा आर्थिक-सामाजिकदृष्ट्या संपन्न कुटुंबात स्वातंत्र्य आंदोलनाचे बाळकडू त्यांना मिळाले. तरुण वयातच लक्ष्मी स्वामीनाथनने उत्साहाने ब्रिटिश साम्राज्यवादाविरोधी राष्ट्र ीय चळवळीत उडी घेतली. परकीय वस्तूंची होळी करताना स्वत:चे महाग कपडे व खेळणी जाळताना त्यांना अजिबात वाईट वाटले नाही.

Tuesday, September 11, 2012

महिला कॉन्स्टेबल आत्महत्या:


महिला कॉन्स्टेबल आत्महत्या: 

एपीआय शेखलासह हवालदाराला पोलिस कोठडी

प्रतिनिधी | Sep 11, 2012, 15:45PM IST


औरंगाबाद- लैंगिक छळाला कंटाळून महिला कॉन्स्टेबल संध्या मोरेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक वाय.एन. शेखसह मुख्य हवालदार एस.व्ही. बोंडलेला कोर्टाने 14 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सोमवारी या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास संध्या धर्मा मोरे (22, रा. करमाड, मूळ रा. धुळे) हिने आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी संध्याने लिहिलेली दोन पानी चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून, त्याआधारेच शेख आणि बोंडसे यांच्यावर कारवाई करण्यात आली. दोन्ही आरोपींना  कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना 14 सप्टेबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Saturday, September 8, 2012

महिलांचा सन्मान ?
समाजात स्त्रियांचा सन्मान केला जावा असे कितीही सांगितले जात असले तरीही आपल्या देशात अजून तरी या बाबतीत मध्ययुगीन मानसिकताच दिसत आहे. परवा एकाच दिवशी देशातील विविध न्यायालयांनी बलात्कार आणि खुनाच्या तीन बहुचर्चित गुन्ह्यांमध्ये काही आरोपींना शिक्षा सुनावली
तर काहींना पुराव्याअभावी निर्दोष सोडले. देवीचे रूप मानली गेलेली स्त्री खरोखरच किती सुरक्षित आहे याचा नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला वेध.
भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवीसमान मानले जाते. तिला गृहलक्ष्मीसारखी देवत्वापर्यंत पोहोचवणारी अनेक विशेषणेही लावली जातात. पण, स्त्रीबद्दलची ही भावना केवळ साहित्यात आणि पुराणांमध्येच आढळते. समाजातील पुरुष महिलांकडे बुभूक्षित नजरेने पाहताना दिसतात. दिल्लीसारख्या अनेक शहरांमध्ये अंधार पडल्यानंतर स्त्रियांना घराबाहेर पडण्याचा विचारही करता येत नाही. चालत्या रेल्वेतही स्त्रीवर बलात्कार केला जातो. दरोडा घालण्याच्या उद्देशाने घरात शिरल्यानंतर घरातील स्त्रियांची निर्घृण हत्या करून त्यांच्या निर्जीव देहावर पाशवी बलात्कार करणारे नराधमही आपल्या देशात सापडतात. राज्याच्या सांस्कृतिक राजधानीतील कॅबचालक व्यवसायाची गरज म्हणून वेळी-अवेळी कामाला जाणार्‍या महिलांवर अत्याचार करून त्यांची हत्या करतात. अशा परिस्थितीत देशातील महिला सुरक्षित आहेत असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
यत्र नार्यस्तू पूज्यंते वगैरे अनेक सुभाषिते आणि वचने आपल्या पुराणांत आणि साहित्यात विखरून पडलेली आहेत पण त्यांचा आपल्या प्रत्यक्ष जीवनात थोडासाही आढळ होताना दिसत नाही. काल देशाच्या तीन विविध वरिष्ठ न्यायालयांत या संबंधातले खटले निकाली निघाले आणि आपल्या या संबंधातल्या वर्तनावर प्रकाश टाकून गेले. गेल्या दहा वर्षांपासून देशभर गाजत असलेल्या प्रियदर्शि ी मुट्टू खून खटल्यातला आरोपी संतोषकुमार सिंग याला उच्च न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा सर्वोच्य न्यायालयाने सौम्य केली आणि ती जन्मठेपेत परिवर्तीत केली. शिक्षा सौम्य झाली असली तरीही तो आपल्या देशात या सर्वात कठोर शिक्षेच्या संदर्भात सुरू असलेल्या वादाचा एक भाग आहे पण मुळात त्याला सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवले आहे, त्याला निर्दोष सोडायला नकार दिला आहे. एक सुशिक्षित वकील पैशाच्या मस्तीत एखादी तरुणी आपल्याला बधत नाही असे पाहून चिडून तिचा खून करू शकतो हे या प्रकरणात पुरतेपणी सिद्ध झाले. या घटनेतील आरोपी वकिल आहे. पण, तो डॉक्टर, इंजिनिअर किंवा प्रतिष्ठित व्यावसायिकही असू शकेल.
आपल्या समाजात पुरुषांची स्त्रियांकडे पाहण्याची एक दृष्टीच या निमित्ताने प्रकट झाली आहे. याच दिवशी एका न्यायालयाने कॉल सेंटरमध्ये काम करणार्‍या महिलेच्या हत्येबद्दल अशा कर्मचार्‍यांची वाहतूक करणार्‍या वाहनाच्या चालकाला दोषी ठरवले आहे. या संबंधात तर या चालकाने आपल्या नृशंसतेचे भीषण दर्शन घडवले आहे. अनेक प्रकारच्या युक्त्या करून त्याने तिला एकटीलाच आपल्या गाडीत घेतले आणि निर्जन रस्त्यावर तिच्यावर बलात्कार करून तिचा खून केला. हा अपराध सिद्ध झाला आहे. हा चालक अशिक्षित आहे. शिक्षणाने माणूस विचारी होतो आणि अशिक्षित माणूस अविचारी असतो त्यामुळे त्याने हा अविचार केला गेला असावा असे म्हणता येते. पण, 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस च्या (टीआयएसएस) त्या सहा विद्यार्थ्यांनी तर अविचार करायला नको होता. समाजात काही तरी संशोधनात्मक काम करण्याचे शिक्षण घेत असलेल्या सुशिक्षित विद्यार्थ्यांनी तर एका अमेरिकन मुलीवर बलात्कार केला. खरे तर असा अविचार करणार्‍यांमध्ये सुशिक्षित आणि अशिक्षित असा भेदभाव न करता सुंसस्कृत आणि असंस्कृत असा भेदभाव करायला हवा. कार ण अशी विकृती मनात राखणार्‍या आणि ती प्रत्यक्षात उतरवणार्‍या नराधमांना असंस्कृतच म्हटले पाहिजे.

आरक्षण नको..सन्मान हवा !


या महिन्यात महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचे हक्क, जागृती, सवलती, समानता, विविध क्षेत्रातील भरीव कार्ये इ. संबंधी वेगवेगळया माध्यमातून पुष्कळ लिखाण प्रकाशित झाले. (त्यातील पुरुष लेखकांचे प्रमाण नगण्य आहे. ) तथापि काही भारतीय समाजात स्त्रीची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी आवश्यक असे काही पायाभूत मुद्दे अध्यापि चर्चिले गेलेले नाहीत असे वाटते.
गेल्या दोन दशकात महिलांसाठी अनेक सामाजिक सुविधा, सवलती , कायदे, आरक्षण केले गेले आहे. त्यापैकी पुष्कळसे राबविलेही गेले आहेत. तथापि, बहुजनसमाजातील सर्वसामान्य महिलेपर्यंत यातील कितीशा सवलती आणि कायदे पोचले आहेत आणि त्यांचा त्यांना कितपत लाभ झाला आहे हा अभ्यासाचा विषय आहे. अशा प्रकारचे कायदे आणि आरक्षण यांमुळे समाजातील सर्व थरांमधील स्त्रियांच्या मुलभूत गरजा भागल्या जात आहेत का आणि शोचनीय गैरसोयी दूर झाल्या आहेत का याचा विचार व्हावा. तसेच समाज मानसातील स्त्रीचे स्थान त्यामुळे खरोखरच उंचावले आहे का व उद्याच्या भावी पिढीची शिल्पकार म्हणून या कायदे व सुविधांची तिला काही मदत होत आहे का याचाही पडताळा व्हायला हवा.
‘स्त्रीदास्य घालवण्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या स्त्रियांचा हा सन्मान
अफाट समूदायाने अनुभवला लीलाताईंचा कृतज्ञता सोहोळा
नागपूर, १९ ऑगस्ट/ प्रतिनिधी

सामाजिक परिवर्तनासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या लीलाताई चितळे यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा मर्मस्पर्शी सोहोळा अफाट समुदायाच्या साक्षीने संपन्न झाला. नागपूरची सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा प्रतिबिंबित करणारा हा कार्यक्रम सर्वच स्तरातील महिलांच्या मनात लीलाताईंविषयी असलेले प्रेम, आदर, आपलेपण व्यक्त करणारा होता. क्वचित एकत्रित येणाऱ्या महिला आज एकदिलाने लीलाताईंच्या गौरवकार्यात आपापली जबाबदारी पार पाडताना दिसल्या. सायंटिफिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात लीलाताईंच्या ६८ वर्षांच्या सेवाकार्याचा लेखाजोखा त्यांच्या जीवाभावाच्या सख्या, सोबती, नातेवाईक आणि समविचारी महिलांनी मांडला. लीलाताईंनी १६ ऑगस्टला ८१ वर्षांत पदार्पण केले म्हणून ८१ तेवत्या दिव्यांची रास व्यासपीठावर प्रज्वलित करण्यात आली.

Friday, September 7, 2012

महिलांविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांत वाढ
(07-09-2012 : 00:01:01)

नवी दिल्ली। दि. ६
(लोकमत न्यूज नेटवर्क)
मागील काही वर्षांत महिलांविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांत झालेली वाढ चिंताजनक असून, याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.
इंटेलिजंन्स ब्युरोतर्फे पोलीस महासंचालक तसेच महानिरीक्षकांच्या तीन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनानंतर शिंदे म्हणाले, महिलांविरोधांतील गंभीर गुन्ह्यांची संख्या कमी करायची असल्यास महिला पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. सायबर स्पेसचा दहशतवाद्यांकडून होत असलेला गैरवापर, आसाममधील हिंसाचारानंतर सोशल मीडियाचा झालेला बेजबाबदार वापर, नक्षलवाद्यांचे आव्हान याचाही आढावा घेतला.
83,829 महिला पोलिस कोट्यवधी महिलांची सुरक्षा करतात.

दोन मुलांना पोसण्यासाठी मातेने विकले तान्हे बाळ!


दोन मुलांना पोसण्यासाठी मातेने
 विकले तान्हे बाळ!
दलालांच्या सापळ्यात सापडलेल्या महिलेचे कृत्य
सुहास बिऱ्हाडे ,मुंबई 
नवऱ्याने घराबाहेर काढले, पोटात अन्नाचा कण नाही.. तीन लहान मुलांना घेऊन ती घराबाहेर पडली. छोटा मुलगा तर अवघा दीड महिन्याचा. पोरांना काय खाायला घालू या विवंचनेत असलेली ती आई अगतिक झाली होती.. मदतीच्या आशेने रस्त्यावरच इकडेतिकडे पाहात होती. दोन महिला तिच्यासमोरच उभ्या राहिल्या. कनवाळू नजरेनं त्यांनी तिला न्याहाळलं आणि तिला जणू देव भेटल्याचा भास झाला. त्या महिलांबरोबर ती चालू लागली. त्यांनी आसरा दिला, पण मुलांसह सगळ्यांचा सांभाळ करायचा असेल तर पैसे लागतील, अशी अट त्यांनी घातल्यानं ती भेदरली. आता काय वाढून ठेवलंय, या चिंतेनं पुन्हा सैरभैर झाली. पण आसरा तर हवाच होता. तिची ही अवस्था ओळखून त्या महिलांनीच तिला उपाय सुचविला. दीड महिन्यांचं तान्हुलं बाळ विकायचं आणि हाती पैसे येतील, त्यात पुढचं आयुष्य जगायचं!.. नाइलाजाने ती तयार झाली.. आणि एका स्वयंसेवी संस्थेकडे सौदाही झाला. दीड लाखाचा.. 
..आणि, मुले विकणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला! या स्वयंसेवी संस्थेने हा प्रकार ‘लोकसत्ता’ला कळविला आणि टोळीची पाळेमुळे खणण्यासाठी जाळे टाकण्यात आले. कांदिवलीच्या चारकोप येथे एका असहाय्य मातेचे बाळ विकण्याच्या धक्कादायक प्रकाराला वाचा फुटली! !
अमृता साळवी ऊर्फ अमृता झुबेर मोहम्मद खान (२०) ही महिला कांदिवलीच्या एकता नगर येथे नवऱ्यासोबत राहात होती. पाच वर्षांची सिमरन, दीड वर्षांचा अर्शद आणि अवघे ४५ दिवसांचे तान्हुले बाळ. तिचा नवरा वायरमनचे काम करायचा. आíथक परिस्थिती अतिशय हलाखीची. त्यात गेल्या शनिवारी घरात भांडय़ाला भांडं लागलं आणि रागावलेल्या नवऱ्याने तिला घराबाहेर काढले. भुकेल्या मुलांना खायला काय देणार या विवंचनेत फिरत असताना रेश्मा खान (३५) आणि ललिता पासवान (२२) या दोन महिला तिला भेटल्या. त्यांनी अमृताला आसरा दिला, पण पैशांसाठी तिसरे बाळ विकण्यासाठी गळ घातली. बाळ विकून थोडे पसे येतील त्यातून दोन मुलांचे संगोपन कर, असा सल्ला त्यांनी दिला. परिस्थितीपुढे हतबल झालेली अमृता तयार झाली..



महिलांवरील अत्याचार वाढले
Bookmark and Share

PrintE-mail
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कबुली
पीटीआय
नवी दिल्ली
गेल्या काही वर्षां

त महिलांवर होणाऱ्या गंभीर गुन्ह्य़ांच्या कमालीची वाढ झाली असल्याची कबुली देत महिलांविरोधातील गुन्हे रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी येथे केले. देशभरातील पोलीस महासंचालक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी गृहमंत्री बोलत होते. लहान मुलांच्या अनैतिक व्यापाराच्या घटनांमध्येही मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आले असून पोलिसांनी या प्रकरणीही दोषींविरोधात कठोर पावले उचलावीत, असे आदेशही गृहमंत्र्यांनी या वेळी दिले. सन २००९ ते २०११ या काळात महिलांवरील गंभीर गुन्ह्य़ांची संख्या लक्षणीय वाढली आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
 पोलिसांनी देखील याप्रकरणी गंभीर दखल घेत महिलांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असे निर्देश गृहमंत्री शिंदे यांनी या वेळी दिले.देशात मुलांवरील गुन्हय़ांच्या तीव्रताही वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त करून शिंदे म्हणाले की, सन २०११ मध्ये देशभरात सुमारे ६० हजार मुले बेपत्ता झाल्याची नोंद आहे. हा आकडा गंभीर असून पोलिसांनी त्याची दखल घेऊन त्यादृष्टीने ठोस कारवाई करावी. ते पुढे म्हणाले की, नॅशनल इन्फॉरमॅटिक सेंटरने मुलांचा शोध लावण्यास उपयुक्त ठरेल, असे उपकरण विकसित केले आहे. हे उपकरण प्रायोगिक तत्त्वावर गेल्या तीन वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये यशस्वी झाल्याचा दावा करीत लवकरच हे उपकरण देशभरातील सर्वच पोलीस ठाण्यांसह बालसंगोपन केंद्रांनाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.  दरम्यान, देशभरातील पोलीस दलांमध्ये महिलांची संख्या वाढविण्याबद्दलच्या सूचनाही केंद्रीय गृहमंत्र्यांनी सर्व राज्यांच्या पोलीसप्रमुखांना केली.

साभार; http://www.loksatta.com

Thursday, September 6, 2012


ती विश्वमाता

भ्रूणहत्या ही वंशाचा दिवा म्हणजे मुलगा, या गैरसमजुतीतून केली जात आहे. त्यामुळे मुलींची संख्या कमी होत असल्याचं चित्र आहे. मुलीला परक्याचं धन म्हणून डिवचणारे लोक अजूनही समाजात आहेत. त्या अजाण लोकांना कोणीतरी जाऊन समजवावं की, अशा कितीतरी मुली आहेत, ज्या काबाडकष्ट करून आपल्या आई-वडिलांना सांभळत आहेत. मुली पुढे जाऊन आई होतात. मोठय़ा कष्टांनी मुलांना वाढवतात. स्त्रीच्या रूपांवर प्रकाशझोत टाकण्याचा केलेला हा प्रयत्न.
ते शब्द मल्याळम् भाषेतील. पण मराठीतील असावेत इतके परिचयाचे होते. एका तरुण विधवा मातेच्या रडण्यातून ऐकू येणारे केरळमधील उद्गार आमच्या कोकणातील रत्नागिरीच्या सिंधुताईच्या तोंडून पन्नास वर्षापूर्वी मराठीतून ऐकले होते.‘‘माझ्या दोन मुलांसाठी मला कामाची गरज आहे. मला काहीतरी स्वयंपाकपाण्याचे काम आणि दिवसभर पडेल ते काम मिळवून द्या हो.’’
सिंधुताई महिला मंडळाच्या अध्यक्षबाईंना अर्धशतकापूर्वी रडत रडत विनवत होती. नऊवारी, लुगडे, घट्टा अंबाडा आणि हातात साध्या काचेच्या बांगड्या, अशा वेषातील तिची मूर्ती अजून नजरेसमोर येते. आज दक्षिणेकडील संपूर्ण साक्षर अशा केरळ राज्यात चर्चच्या पुढील प्रांगणात फिलोमिना ही तरुण, रोमन कॅथलिक आई प्रिस्टकडे रडत, हुंदके देत मल्याळम् भाषेतून विनवत होती.
‘‘फादर मला टायपिंग येतं. मी ते तर करीनच. पण ऑफिसचे इतर पडेल ते कामही करीन. मला माझ्या दोन मुलांसाठी नोकरीची फार गरज आहे. मी संध्याकाळच्या कॉम्प्युटर क्लासला जाऊन ते कौशल्यही शिकून घेईन.’’
फिलोमिना पांढ-या रंगाची, बारीक काळी नक्षी असलेली साडी नेसून उभी होती. वैधव्य आल्यानंतर पहिल्या श्राद्धापर्यंत या राज्यातील रोमन कॅथलिक स्त्रियांचा तो पोषाख असतो. सिंधुताई हिंदू तर फिलोमिना ख्रिश्चन. एक मराठी तर दुसरी तिच्यापासून हजारो मैल दूरची केरळी. दोघींच्या वयात अर्धशतकाचं अंतर. पण दोघीत एक मोठं साम्य.
आपल्या अजाण बाळांना सुरक्षित, सुखाचं भविष्य देण्याची दोघींची धडपड. एका मातेची माया आपल्याला अवगत असणा-या कौशल्यांचा वापर करून दिनरात मेहनत करण्याची आणि नवीन कौशल्य शिकून आपल्या बाळांसाठी अधिक कमाई करण्याची दोघींची तयारी. पन्नास वर्षापूर्वी सिंधुताई शिवणकाम शिकली आणि रात्रीच्या वेळी कपडे शिवून आपल्या मुलांच्या बारीक-सारीक गरजा भागवण्यासाठी चार पैसे मिळवत राहिली. आज फिलोमिना टायपिस्टची नोकरी करता करता कॉम्प्युटर शिकण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
 सिंधुताईची मुलं गुणी निघाली. मुलगा सरकारी नोकरीत स्थिरावला आणि मुलगी शिक्षिका बनली. गेली तीस र्वष मी सिंधुताईला एक सुखवस्तू, मध्यमवर्गीय, सुसंस्कृत स्त्रीच्या भूमिकेत पाहत आले आहे. पण तिची मुलं लहान असताना त्यांचा एखादा बालहट्ट पुरवता न आल्यामुळे तिच्या मनाला किती वेदना झाल्या असतील! शाळेतील इतर मुलांचे कपडे, त्यांची खेळणी, त्यांच्या डब्यातील चविष्ट खाऊ पाहून त्या मुलांनी सिंधुताईकडे नक्की हट्ट धरला असेल. त्यांचा हट्ट पुरवता न आल्याने त्या आईच्या डोळ्यांतून कितीदा अश्रू वाहिले असतील! कधीतरी त्या बाळांना चापटी मारावी लागली असेल आणि मग त्या शिक्षेनं तिचं स्वत:चंच मन तिला छळू लागले असेल! आई आणि मुलं यांचं नातं असं वेगळं असतं.
 करूनि माता अनुराग-राग।
विकासवी बाळ मनोविभाग।।
फळे तरू सेवुनि उष्ण शीत।
जगी असे हिची विकासरीत।।
साने गुरुजींच्या या अर्थपूर्ण काव्यपंक्तीतून हे माता-बाळाचं नातं स्पष्ट होतं. पन्नास वर्षापूर्वीच्या सिंधुताईच्या भूमिकेत आज ही फिलोमिना उभी आहे. पण काळ खूप बदलला आहे. देशात आर्थिक उदारीकरण वैश्विकीकरण यांचे वारे वाहत आहेत. ठिकठिकाणी मॉल्स, मल्टिप्लेक्स उभे आहेत. मुलांचे कपडे, खेळणी, खाऊ यांमध्ये जागतिक स्वरूपाची विविधता आली आहे. साहजिकच मुलांचे हट्ट पुरविताना सुखवस्तू पालकांनाही जड जाऊ लागले आहे. अशा परिस्थितीत फिलोमिना तिच्या तुटपुंज्या मिळकतीत आपल्या दोन बाळांना कशी वाढवू शकेल, कोण जाणे!
मुलांच्या जीवनात पन्नास वर्षात फार मोठे बदल झाले आहेत. वयाच्या तिस-या वर्षापासून स्पर्धेच्या चक्रात ती सापडली आहेत. या जीवघेण्या स्पर्धामुळे त्यांचे बाल्य जणू अवेळी संपुष्टात येत आहे. त्यातूनच बाल आणि कुमार वयातील मुलं-मुली ‘टेन्शन’ अनुभवत आहेत. शाळकरी मुलांच्या आत्महत्यांच्या बातम्या कानावर पडत आहेत.
इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रसारामुळे घरोघरी विविध प्रकारच्या बातम्या आणि माहिती यांचा जणू पूरच आला आहे. त्यातूनच गुन्हेगारीकडे शाळकरी मुले आकृष्ट होताना दिसत आहेत. एक अल्प आर्थिक कुवत असणारी ही तरुण आई या सर्व संकटांचा एकटीने मुकाबला करू शकेल का? सिंधुताईपेक्षा फिलोमिनाची वाटचाल नक्कीच अधिक खडतर आहे.
सहा वाजले आणि चर्चची घंटा वाजू लागली. प्रार्थनेसाठी भाविक येत होते. चर्चवरील भिंतीवर मदर मेरी आपल्या कुशीत येशूबाळाला घेऊन येणा-या भाविकांना आशीर्वाद देत होती. ती विश्वमाता फिलोमिनाच्या मागेही असू दे. तिच्या आयुष्याची वाटचाल निर्विघ्न होवो.


मी आदिवासी बोलतेय!


आदिवासींवर होणा-या अन्यायाच्या घटना नव्या नाहीत. त्यांना नक्षलवादी ठरवून त्यांच्या हत्या केल्याच्या घटनाही घडत आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळून 65 वर्ष झाली असली तरी आदिवासींवर अन्याय होतातच का, याची व्यथा मांडणारं एका आदिवासी कन्येचं हे स्वगत..
आज मी बोलणार आहे. इतकी र्वष मनाला बोचणा-या यातना सहन करून जगणारी मी. ढोरांसारखी मेहनत करून उपाशी मरणारी मी. जंगलाची राणी असूनही बेघर अशी मी. आज मी बोलणार आहे. माझ्या सहनशक्तीचे बंध आता फुटलेत. मूग गिळून बसणं आता केवळ अशक्यच ! गेल्या आठवडय़ात सर्व भारतवासीयांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला. झेंडावंदन, मिरवणूक, पताका.. सारं काही अगदी उत्साहात! पण मी तुम्हाला विचारते, आपण खरंच स्वतंत्र झालोत की, स्वातंत्र्याचा फक्त टेंभा मिरवतोय? ते इंग्रज होते ज्यांनी आपल्या देशावर राज्य केले आणि ते क्रांतिकारी ज्यांनी देशाला गुलामगिरीतून मुक्त केलं. पण आजचं काय? खरंच गुलामगिरी संपली? खरंच स्वातंत्र्य आलं? अन् आलं तरी कसलं स्वातंत्र्य?

देशात बांगलादेशीयांना आश्रय देऊन मूळ निवासी असलेल्या आमच्या जातबांधवांना त्यांच्या जागेवरून हुसकावून लावण्याचं स्वातंत्र्य? नक्षलवादी सांगून छाताडावर गोळ्या घालण्याचं स्वातंत्र्य. आमच्या जमिनी हिसकावताना आया-बहिणींची अब्रू लुटण्याचं स्वातंत्र्य.. की, आम्हाला मिळणा-या सवलतींच्या जोरावर गाडय़ा फिरवण्याचं स्वातंत्र्य? नेमकं कसलं स्वातंत्र्य? एकेकाळी जंगलाची राणी मानली जाणारी मी, आज लाचार कुणामुळे झालेय? कोण जबाबदार याला? भ्रष्टाचारी नोकरशाही, जी फक्त आकडे मोजून गरिबी कमी झाल्याच्या फुशारक्या मारते की, आमच्या सवलतीवर स्वत:चे खिसे गरम करणारे की, आमच्या जमिनीवर रक्ताचे पाट वाहून राजमहाल बांधणारे दलाल. आमच्या समस्यांचं भांडवल करून स्वत:ची पोळी भाजणारे राजकारणी की, आम्हाला लाचार, बिच्चारे म्हणवणारे पांढरपेशी..? कोण कोण जबाबदार आहे?

कधी कुणावर विसंबून न राहिलेली मी आज लाचार का झाले? आमच्या जमिनींवर, सवलतींवर डोळा ठेवणारे का फोफावलेत? आम्हाला जमीनदोस्त करून आमचं अस्तित्व मिटवू पाहणा-यांची वृत्ती का अधिकाधिक सोकावत चाललीय? देशाची सर्वात पहिली वासी मी. आज माझंच अस्तित्व धोक्यात आलंय नि असे करणारे कोण? माझेच देशबंधू ! मग मी स्वतंत्र कशी? एकीकडे लखलखत्या दुनियेत प्रगतीचे आकडे भराभर वाढत असताना महासत्ता बनण्याची स्वप्नं घडणा-या देशात आम्हाला पिण्याचं पाणी नशिबात नाही, मग कसली प्रगती.? राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा म्हणवणा-या या देशात जंगलच्या राणीची अशी केविलवाणी अवस्था असेल तर अशा स्वातंत्र्यापेक्षा इंग्रज बरे, असं म्हटल्यास नवल ते काय !!

तर दुसरीकडे आमच्या जमिनी घशात घालण्यासाठी आमच्या जात बांधवांची खुलेआम कत्तल केली जातेय. त्यांना नक्षलवादी ठरवलं जातंय. रोजच्या रोज नक्षलवाद्यांना मारल्याच्या बातम्या मोठय़ा अभिमानाने सांगितल्या जातायत. मग नक्षलवाद संपत का नाही? कारण मारले जाणारे माझे जात बांधव आहेत, नक्षलवादी नाही .. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणा-या समाजाचे रक्षक म्हणवणा-याचं हे अघोरी कृत्य! रक्षक हेच आमचे भक्षक बनल्यास स्वरक्षणासाठी आम्ही बंदुका का उचलू नयेत? जिथे आम्हाला पिण्याचं पाणी नाही तिथले सरकार मोफत मोबाइल वाटप जाहीर करते. वा खरंच किती मोठी प्रगती आहे ही! जर असंच आमचं शोषण होत राहिले तर आमचं अस्तित्वच नष्ट होईल. आमच्यावर अन्याय करणाऱ्या लांडग्याची आग शमेल.. थांबवा हा अन्याय! अन्यथा आम्ही पेटून ऊठू आणि आमच्यावर अन्याय करणाऱ्यांना भस्म करू! आमच्या सहनशक्तीचा अंत आता संपलाय.. तेव्हा क्रांती झाली होती इंग्रजांविरुद्ध! आता ही एक क्रांती घडेल आमच्यावर अन्याय करणा-याविरुद्ध!

अबला नाही सबला

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image 
स्त्रियांवर अत्याचार नाही, असा एकही देश नाही. हल्ली महिलांच्या छेडछाडीच्या घटनांमध्येही कमालीची वाढ होत आहे. याला कारणीभूत जितका आपला समाज आहे, तितक्याच महिलाही आहेत. त्यांनी स्वत:च स्वत:चं संरक्षणाचं तंत्र निर्माण केलं पाहिजे.


विनयभंगाच्या घटनांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्याने खळबळ माजवलेली आहे. आशिया खंडातील परिस्थिती तर बिकटच म्हणावी अशी आहे. भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान हे परंपरावादी देश आहेत. इथे पुरुषप्रधान संस्कृती नांदत आहे. पण इथे फक्त रस्त्यावरच महिलांची छेडछाड केली जाते, असं नाही तर परिचित-अपरिचित महिलांच्या नावाने रेल्वे डब्यांच्या भिंतीवर, सार्वजनिक शौचालयांच्या भिंतीवर गलिच्छ, अश्लील शब्दांत शेरेबाजी लिहिली जाते. भारतात रोडरोमिओ किंवा छेडछाड करणा-यांच्या विरोधात पोलिस कारवाई करतात; पण त्यामुळे असे गैरप्रकार कमी झाले आहेत अथवा बंद झाले आहेत, असं चित्र दिसत नाही. तर अधूनमधून वर्तमानपत्रांतून अशा प्रकारच्या बातम्या वाचण्यात येतात. पीडित महिलेला वाळीत टाकणं, सार्वजनिक ठिकाणी तिचे कपडे उतरवणं इत्यादी प्रकारच्या घटना घडत आहेत.
इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात स्त्रियांच्या चळवळीने स्त्रियांविषयीच्या वातावरणात पुष्कळसा बदल केला आहे. तरीही स्त्री अत्याचाराच्या घटना घडत आहेत. देशातील प्रगत राज्यांपैकी एक अशी महाराष्ट्राची ओळख आहे. पण प्रगतीच्या वाटेवर असणा-या या राज्यात महिला आणि तरुणींना पुरेशी सामाजिक सुरक्षितता आहे का? तर नाही! कारण महाराष्ट्रात दिवसागणिक छेडछाडीच्या व विनयभंगाच्या घटनांमध्ये कमालीची वाढ होत आहे. मध्यंतरी आसाममध्ये गुवाहटीत भर रस्त्यावर मवाल्यांच्या टोळक्याने एका तरुणीची छेड काढल्याचा प्रकार एका व्हिडिओमुळे प्रकाशात आला. त्यानंतर देशात संतापाची लाट उसळली. पण त्याचवेळी महाराष्ट्रातही विनयभंगाच्या घटना मोठय़ा प्रमाणावर घडत होत्या आणि त्याविषयी फारसा गदारोळ उठत नव्हता.