आदिवासी जमात' हे वर्णन ज्या ज्या लोकसमूहांना लावण्यात येते. त्या सर्व जमाती आधुनिक काळात, आधुनिकतेची विविध साधने उपयोगात आणीत जगत आहेत. आधुनिक स्वरूपाचे परिवर्तन या जमातीत होताना दिसते. या सर्व गोष्टी विचारात घेता,`आदिमता
म्हणजे मानवी जीवनाची प्राचीनतम निसर्गाश्रयी जीवनावस्था' असे मान्य केले तर मानवी जीवनाची ही प्राचीनतम निसर्गाश्रयी जीवनावस्था अवशेषात्मकतेने ज्या समूह जीवनात प्रकटने तसेच वांशिकदृष्टय़ा पृथक (वेगळे) अस्तित्व ज्या समूहाचे जाणवते. त्या समूहांना आदिम असे म्हणता येईल.
आदिवासी हे सर्व विश्वाचेच मूलाधार आहेत. अगदी प्राचीनातील प्राचीन संस्कृती या आदिम संस्कृतीतूनच निर्माण झालेल्या आहेत. निसर्गाचा सहज आणि वैखिक आविष्कार आदिम जीवनात झालेला दिसतो, म्हणून तर भूतमात्रांशी जिव्हाळा आणि त्यांच्याशी अतूट नाते राखत जीवन जगायचे असते, हे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळालेले असते. आदिवासी हे सांस्कृतिकदृष्टय़ा नागर समाजापेक्षा प्रगत आहेत. माणुसकी, सहकार्याची भावना, त्रियांना समान वागणूक या गोष्टी आदिवासी समाजातच दिसतात. म्हणूनच सांस्कृतिकदृष्टय़ा आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज नाही, उलट आदिवासी संस्कृतीही सर्व जगाला आदर्शभूत ठरणारी आहे. कुसूम अलाम आपल्या कवितेत म्हणतात-
`माणसाला माणूसपण बहाल करण्याची शक्ती
आदिम संस्कृतीचा मूलत्रोत आहे'
वर्षानुवर्षे आदिवासी निसर्ग सान्निध्यात, दर्याखोर्यात, जंगलात, अतिदुर्गम भागात राहात असल्यामुळे भौतिक सुविधा त्याच्यापर्यंत तितक्या झपाटय़ाने पोहोचू शकल्या नाहीत. आज एका बाजूला देशाने विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगाने प्रगती केली आहे. जागतिकीकरणामुळे देशादेशांच्या सीमा एकमेकांना जोडल्या गेल्या आहेत, पण दुसर्या बाजूने देशाला स्वातंत्र्य मिळून 62वर्षे पूर्ण होऊनही आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज, सरकारी योजना या भौतिक सुविधा आदिवासींपर्यंत पोहोचलेल्या दिसत नाहीत. दुर्गम भागात राहात असल्यामुळे आदिम समाज नागर समाजापासून दूर राहिला. भौतिक परिवर्तनापासून हा समाज वंचित राहिला, म्हणूनच आदिवासी समाज मागासलेला आहे, तो भौतिक दृष्टीने, सांस्कृतिक दृष्टीने मात्र तो विश्वाला दिशादर्शक ठरणारा आहे.