
चैत्रा
रेडकर
स्थानिक
स्वराज्य
संस्थांमध्ये
स्त्रियांसाठी
५०
टक्के
जागा
राखीव
झाल्या
.
परंतु
सर्वच
राजकीय
पक्षांना
राजकीय
घराण्यातील
स्त्रियांशिवाय
इतर
उमेदवार
सापडत
नाही
,
हा
अनुभव
आहे
.
अशा
परिस्थितीत
सत्ता
हळूहळू
झिरपत
सर्वसामान्य
स्त्रियांपर्यंत
पोहोचेल
,
अशा
भरवशावर
निश्चिंत
राहणे
,
हे
परिवर्तनवादी
निष्ठेला
शोभेलसे
निश्चितच
नाही
.
महाराष्ट्रात
स्थानिक
स्वराज्य
संस्थांमध्ये
स्त्रियांसाठी
५०
टक्के
जागा
राखीव
ठेवण्याचा
कायदा
तयार
झाल्यानंतर
पहिल्यांदाच
महानगरपालिकांच्या
निवडणुका
होत
आहेत
.
निवडणूक
प्रक्रियेत
स्त्रिया
मोठ्या
संख्येने
सहभागी
होणे
,
हे
भारतीय
लोकशाहीच्या
सर्वदूर
पोहोचण्याच्या
दृष्टीने
निश्चितच
स्वागतार्ह
आहे
.
लोकशाहीचे
भवितव्य
समाजाच्या
विविध
घटकांना
राजकीय
प्रक्रियेत
सहभागी
करून
घेण्याने
सुरक्षित
होते
.
मतदानाचा
अधिकार
जरी
सर्वांना
असला
तरी
निर्णय
प्रक्रिया
जर
ठराविक
लोकांच्या
किंवा
विशिष्ट
समाजघटकांच्या
हातात
राहणार
असेल
,
तर
ती
लोकशाहीला
दुबळी
बनवणारी
बाब
असते
.
लोकशाहीला
केवळ
निवडणूक
प्रक्रियेपुरता
मर्यादित
न
ठेवता
तिला
अधिकाधिक
आशयघन
बनवण्याचा
जो
दूरचा
पल्ला
गाठायचा
असतो
,
त्यादिशेने
प्रवासाची
सुरुवात
लोकशाही
प्रक्रियेत
विविध
समाजघटकांचा
सहभाग
जाणीवपूर्वक
वाढवूनच
होत
असते
.
या
दृष्टीने
स्थानिक
स्वराज्य
संस्थांमध्ये
स्त्रियांना
५०
टक्के
जागा
उपलब्ध
होणं
,
हा
महत्त्वाचा
टप्पा
आहे
.
स्त्रियांच्या
सक्षमीकरणाविषयी
आस्था
असणाऱ्याने
या
घटनेकडे
साशंकतेने
बघणे
चुकीचे
ठरेल
.
या
सर्व
प्रक्रियेकडे
उमेदीने
बघण्यातूनच
या
प्रक्रियेत
स्त्रियांसाठी
आश्वासक
अवकाश
निर्माण
करण्याची
शक्यता
आहे
.
याचा
अर्थ
राजकीय
नेते
आणि
राजकीय
पक्ष
स्त्री
सहभागाच्या
किंवा
सबलीकरणाच्या
नावे
जे
जे
करत
आहेत
,
त्याचा
निमूटपणे
स्वीकार
करणे
,
असा
होत
नाही
.
त्याचबरोबर
या
सर्वातून
जे
काही
साधले
नाही
,
त्याचीच
निव्वळ
उजळणी
करत
,
याकडे
उपहासाने
किंवा
निराशेने
बघत
राहण्यातही
काही
अर्थ
नाही
,
कारण
प्रस्थापित
व्यवस्थेत
शिरकाव
करण्याच्या
प्रक्रियेत
वाटाघाटी
/
बार्गेनिंग
अपरिहार्यपणे
येते
.
ज्याच्याशी
बार्गेन
करायचे
आहे
,
त्याचा
उपहास
किंवा
धिक्कार
करून
कसे
चालेल
?