Pages

Monday, September 24, 2012

आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भीमाबाई होळकर!

जागतीक पातळीच्या इतिहाससंशोधकांनी आद्य महिला स्वातंत्र्य सेनानीचा सन्मान दिलेल्या भीमाबाई होळकरांना आमच्या इतिहासाने मात्र काळाच्या कालकुपीत दफन करुन ठेवले आहे, हे एक दुर्दैवच आहे. आज जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने अठराव्या शतकात शिक्षित असलेली, परंपरेच्या जोखडाखाली न वाढवली गेलेली, पिता यशवंतराव होळकरांच्या पावलावर पाउल ठेवत ब्रिटिशांशी सर्वकश युद्ध पुकारणारी ही महान वीरांगना.
भीमाबाईंचा जन्म १७९७ मद्धे पुणे येथे झाला. आईचे नांव लाडाबाई तर पिता भारताचे इंग्रजांचे कर्दनकाळ, आद्य स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव होळकर. दौलतराव शिंदेंनी सत्तालालसेमुळे मल्हारराव होळकर (दुसरे) यांचा पुण्यात खुन केला. यशवंतराव व विठोजींच्याही जीवावर शिंदे उठल्याने उभयतांना पुण्यातुन निसटुन जावे लागले. शिंद्यांनी त्याचा सुड असा घेतला कि नवजात भीमाबाई आणि माता लाडाबाईला कैदेत टाकले. त्यांची सुटका यशवंतरावांनी २५ आक्टोबर १८०२ रोजी पुण्यावर स्वारी करुन शिंदे व पेशव्यांचा दणदणित पराभव केल्यानंतर झाली. तब्बल सहा वर्ष या वीरांगनेला मातेसह कैदेत रहावे लागले.
महिलांच्या सशक्तीकरणाशिवाय 
सर्वोत्कृष्ट देशाची कल्पना अशक्य !
 
दरवर्षी ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. म्हणजेच समाजाने महिलांसाठी सर्मपित केलेला एक दिवस. या दिवशी महिलांचा विकास, त्यांचे सशक्तीकरण या विषयांवर अनेक चर्चा होतात, त्यांच्या विकासासाठी मोठया-मोठया घोषणा होत असतात. परंतु या सगळया प्रयत्नांनंतरही महिलांच्या परिस्थिती मध्ये सुधारणा होत नाही. यासाठी महिलांनीच त्यांचे सामाजिक आणि आर्थिक स्तरावर सशक्तीकरण कसे होईल ते पाहिले पाहिजे.       
आपल्या कुंभार समाजातील महिला वर्षानुवर्ष घरच्या कुंभार उद्योगात सहकारी म्हणुन काम करीत आहेत. ही अभिमानाची बाब आहे की, त्यांच्या सहकार्यामुळेच अनेक वर्ष कुंभार कारागीर आपला व्यवसाय करीत आहेत.सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबात घरातील स्त्रीच कुटुंबाचा गाडा हाकत असते. मुला-बाळांचे संगोपन, वृध्द मंडळींची देखभाल, घरातील कर्त्या पुरूषांच्यामागे (पती) खंबीरपणे उभे राहणे व महत्वाच्या बाबीत निर्णय घेणे. ही कामे प्रामुख्याने स्त्रीयांनाच करावी लागतात. तरी देखील तिच्या कार्याला नगण्य समजले जाते. म्हणुन आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या महिलांना स्वतः सजग राहण्याची गरज आहे. जितक्या मोठया संख्येने महिला आत्मनिर्भर होतील, रोजगार किंवा नोकरी करतील तितक्याच त्या शक्तीशाली होतील. या दिशेने आपण जे पाऊल टाकले आहे, त्यात प्रामुख्याने "महिला बचत गट' हा मुख्य मार्ग समोर आहे. ज्यामुळे महिलांना रोजगार व सन्मान मिळण्यास पर्यायाने त्यांचे सशक्तीकरण होण्यास निश्चितच मदत मिळेल.