Pages

Tuesday, October 16, 2012

बदलत्या जीवनशैलीचा एक परिणाम : घटस्फोट
दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच चालल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. दिल्ली असो वा लखनौ, केरळ किंवा पंजाब, कोलकत्ता किंवा चेन्नई देशातील कुठलेही शहर यापासून बचावले नाही. घटस्फोटाचे प्रमाण जसे उच्च वर्गीय कुटुंबियांत पाहायला मिळत आहे तसेच प्रमाण मध्यम वर्गीयांमध्ये आहे. मेट्रो किंवा सेमी अर्बन भागांमध्येच घटस्फोट होत असल्याचा आरोप होत असला तरी ही वस्तुस्थिती नाही. गेल्या काही वर्षातील या संदर्भात देशाच्या प्रमुख शहरांची आकडेवारी पाहिली तर ही परिस्थिती किती गंभीर आहे याची जाणिव होईल.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या दिल्लीत 1960 साली दर वर्षाला 1किंवा 2 प्रकरणात घटस्फोट होत होते. 1980 मध्ये हे प्रमाण वाढत वर्षाला 100-200घटस्फोटांर्पयत पोहचले तर नव्वदच्या दशकात वर्षाला हजार घटस्फोट झाल्याचे आकडेवारी दर्शवते. पण गेल्या 10-12 वर्षात हे प्रमाण एकाएकी वाढत वर्षाला 9000 र्पयत पोहचले आहेत.