![]() | ![]() | ![]() |
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कबुली
गेल्या काही वर्षांपीटीआय नवी दिल्ली पोलिसांनी देखील याप्रकरणी गंभीर दखल घेत महिलांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असे निर्देश गृहमंत्री शिंदे यांनी या वेळी दिले.देशात मुलांवरील गुन्हय़ांच्या तीव्रताही वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त करून शिंदे म्हणाले की, सन २०११ मध्ये देशभरात सुमारे ६० हजार मुले बेपत्ता झाल्याची नोंद आहे. हा आकडा गंभीर असून पोलिसांनी त्याची दखल घेऊन त्यादृष्टीने ठोस कारवाई करावी. ते पुढे म्हणाले की, नॅशनल इन्फॉरमॅटिक सेंटरने मुलांचा शोध लावण्यास उपयुक्त ठरेल, असे उपकरण विकसित केले आहे. हे उपकरण प्रायोगिक तत्त्वावर गेल्या तीन वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये यशस्वी झाल्याचा दावा करीत लवकरच हे उपकरण देशभरातील सर्वच पोलीस ठाण्यांसह बालसंगोपन केंद्रांनाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, देशभरातील पोलीस दलांमध्ये महिलांची संख्या वाढविण्याबद्दलच्या सूचनाही केंद्रीय गृहमंत्र्यांनी सर्व राज्यांच्या पोलीसप्रमुखांना केली. साभार; http://www.loksatta.com |
No comments:
Post a Comment