Pages

Monday, April 30, 2012

सावित्री जिंदाल : देशातील सर्वात श्रीमंत महिला

 Source: प्रसाद केरकर   |   Last Updated 14:14(19/11/11)
Share | Email  Comment
 http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-savitri-jindal-is-richest-women-in-india-2576744.html
मुंबई- देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांचा समावेश आता फोर्ब्सच्या यादीत झाला आहे. ओ.पी. जिंदाल या उद्योगपींच्या त्या पत्नी. जिंदाल यांचे 2005 मध्ये हेलिकॉप्टरच्या अपघातात निधन झाल्यावर जिंदाल समूहाची सर्व सूत्रे त्यांच्याकडे आली. 60 वर्षीय सावित्री जिंदाल या जिंदाल समूहाच्या आता अध्यक्षा आहेत.

20 मार्च 1950 मध्ये आसाममध्ये जन्मलेल्या सावित्रीबाईंचे लग्न जिंदाल यांच्याशी झाल्यावर त्या हरियाणातील हिस्सार येथे राहावयास आल्या. त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत झालेले असले तरी मारवाडी घरातील एक महिला म्हणून त्यांनी आपला संसार सुरू केला. त्यांना एकूण दहा मुले झाली. पृथ्वीराज, सज्जन, रतन, नवीन यांच्यासह अन्य सहा मुले त्यांना झाली. सध्या त्यांची चार मुले विविध कंपन्यांचा कारभार पाहत असतात. पतीच्या निधनापर्यंत त्या संसारात सक्रिय होत्या. आपले पती उद्योगधंदा करतात याची त्यांना कल्पना होती. अर्थात ते आपल्या व्यवसायातून किती पैसा कमावतात याची त्यांना तोपर्यंत काही कल्पनाही नव्हती. एक गृहिणी म्हणून त्या आयुष्य जगल्या. मात्र, पती ओ. पी. जिंदाल यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे सुमारे 14 अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या जिंदाल समूहाची सर्व सूत्रे आली. यामुळे त्यांचे जीवनमानच बदलून गेले. एक घरगुती महिला ही भूमिका बदलून त्यांना एका उद्योगपतीच्या भूमिकेत जावे लागले. अर्थात ही नवीन भूमिका त्यांनी यशस्विरीत्या वठवली आहे. एवढी श्रीमंती असली तरी त्या अतिशय साधेपणाने आपले जीवन जगतात. साधी कॉटनची साडी त्या नेसतात. देशातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून त्यांचा गौरव झालेला असला तरी त्याची त्यांना कधीच घमेंड वाटत नाही. जिंदाल समूह हा प्रामुख्याने वीजनिर्मिती व पोलाद उत्पादनात कार्यरत आहे.

Sunday, April 15, 2012

अनारोग्याच्या मुळाशी अंधश्रद्धा

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Prahaar
पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया कनिष्ठ असतात, हा सतत बिंबवला जाणारा गैरसमज हे स्त्रियांच्या अनारोग्याचं मुख्य कारण आहे. याचमुळे त्या अंधश्रद्धेच्या बळी ठरतात आणि वाहकही बनतात. लहानपणापासून मुलामुलींना स्वतंत्र व्यक्ती म्हणून, लिंगनिरपेक्षतेनं वाढवायला हवं. मुलींना विकासाच्या शक्य त्या सर्व संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. त्यांच्यामध्ये आत्मसन्मानाची जाणीव निर्माण करायला हवी.


आरोग्याची व्याख्या फक्त शरीरस्वास्थ्याशी निगडित आजार, अस्वच्छता, कुपोषण यासंदर्भात करून चालणार नाही. आरोग्य म्हणजे आजार, रोग, अपंगत्व नसणं हे खरंच पण त्याबरोबरच व्यक्तीचं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य चांगलं असणंही आवश्यक आहे. जेव्हा आपण स्त्रीआरोग्याबद्दल विचार करतो तेव्हा साहजिकच तिचा आर्थिक स्तर, जात, धर्म, सामाजिक स्थान अशा घटकांचा विचार करावा लागतो.
 बाई अंधश्रद्धेच्या आहारी जाते तेव्हा त्याच्या मुळाशी बहुधा आरोग्याशी संबंधित काही तरी प्रश्न असतो. देवळं, मठ, बुवाबाबांकडे जाणाऱ्या भक्तांमध्ये सुखी कुटुंब, नवऱ्याला यश, मुलाला नोकरी, लेकीचं लग्न यांपेक्षा घरातील कुणाच्या किंवा स्वत:च्या आजारपणाने अगतिक होऊन आलेल्या स्त्रियांची संख्या जास्त असते. आरोग्याच्या प्रश्नांवर वैद्यकीय मदत हा उपाय असूनही बायका नवससायास, कर्मकांडांचा मार्ग का अवलंबतात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बाई घरातल्या सगळय़ांची काळजी घेते, दुखलं-खुपलं बघते, घराचा डोलारा सांभाळते. पण तिची काळजी घेणारं कुणी नसतं. आजारपण अंगावर काढून स्वत:चा विचार न करता कुटुंबासाठी झिजणं म्हणजे आदर्श स्त्री, हेच त्यांनी लहानपणापासून पाहिलेलं असतं. बायकांनीच नेहमी त्याग करायचा, हे पिढय़ान् पिढय़ा ठसवलेलं असतं. त्यामुळे करपलेली भाकरी आपल्या नाहीतर मुलीच्या ताटात घालायची आणि उरलंसुरलं, शिळंपाकं आपण जेवायचं. त्यातच धन्यता मानायची. स्वत:च्या शरीराची, आहाराची काळजी घेणं हा त्यांना गुन्हा वाटतो. त्यांचा आहार थोडा आणि निकृष्ट असतो आणि त्याचा परिणाम त्यांना आयुष्यभर भोगावा लागतो. अन्नातून घेतल्या जाणा-या कॅलरीज आणि वापरली जाणारी शरीरशक्ती यांसंबंधीच्या एका अभ्यासात असं आढळलं आहे की रोजच्या कामामध्ये स्त्रिया आपली 53 टक्के शक्ती वापरतात तर पुरुष 31 टक्के. स्त्रिया गरजेपेक्षा 100 कॅलरीज कमी घेतात तर पुरुष 800 कॅलरीज जास्त घेतात. ग्रामीण भागातील 90 टक्के बायकांना अ‍ॅनिमिया असतो. याचं कारण स्त्री-पुरुष भेदभाव. गरीबीमुळे चांगलं आणि पुरेसं अन्न नसतं. त्यातही बाई म्हणून कमी आहार मिळतो. स्त्री-पुरुषांच्या कामाची लिंगभेदावर आधारित विभागणी पाहता बायकांवरचा कामाचा ताण आणि आहार याचा ताळमेळच बसत नाही. 

Prahaar
Facebook this storyFacebook this story
सर्वच थरातल्या बायका अतिशय उत्साहानं आणि अभिमानानं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या वैभवलक्ष्मी व्रताचं पालन करत असतात आणि या महागाईच्या दिवसांत एरव्ही खर्चासाठी हात आखडता घेणारे नवरेसुद्धा बायकांना हे व्रत करायला प्रोत्साहनच देत असतात. व्रतं करून मिळालंच वैभव, तर कशाला सोडा? असा हा दांभिकपणा कायमच सुरू असतो..



शिक्षण घेतल्याने माणूस शहाणा होतो. त्याला स्वत:चं हित-अहित समजतं. भोवताली घडणा-या घटनांचा सारासार विचार करता येतो. त्यातल्या चांगल्या गोष्टी स्वीकारण्याचं आणि वाईट गोष्टी सोडून देण्याचं भान येतं. शिक्षणमहतीचे असे गोडवे गाणारे बुद्धीचे भाट पारंपरिक व्रतवैकल्यांचा मोसम आला की मात्र बिथरतात, असं साधारणपणे दिसून येतं. मार्गशीर्ष महिन्याचा मोसम हे याचं उत्तम उदाहरण. या महिन्यात दर गुरुवारी केल्या जाणा-या वैभवलक्ष्मी व्रताला उधाण येतं. सर्वच थरातल्या बायका अतिशय उत्साहानं आणि अभिमानानं या व्रताचं पालन करतात आणि या महागाईच्या दिवसांत एरव्ही खर्चासाठी हात आखडता घेणारे नवरेसुद्धा बायकांना हे व्रत करायला प्रोत्साहनच देत असतात. व्रतं करून मिळालं वैभव, तर कशाला सोडा? तसा हा दांभिकपणा कायमच सुरू असतो म्हणा. पार्वतीनं तपश्चर्या केली तेव्हा तिला शंकर पती म्हणून लाभला, म्हणून लग्नाआधी गौरीहर पूजतात; पण प्रत्यक्षात कुठली बाई शंकरासारखा मनस्वी आणि भणंग नवरा स्वीकारेल, हा प्रश्नच आहे.
 तांब्याच्या कलशात घातलेल्या पाच प्रकारच्या झाडांच्या फांद्या म्हणजे ही वैभवलक्ष्मी. यासाठी ज्या झाडांच्या फांद्या तोडल्या जातात ती फळझाडं असावीत, असा दंडक आहे. ज्या फांद्यांना उद्या फळं धरणार, त्या तोडण्याचं काम सर्व भाविक मोठय़ा उत्साहानं करतात. इतक्या मोठय़ा प्रमाणावर फांद्यांची तोड झाली तर येऊ घातलेल्या फळांचं किती मोठय़ा प्रमाणात नुकसान होणार. फळांनी डवरलेली झाडं हे वैभव आहे आणि पर्यावरणाची गरजही; पण आपल्याला वैभव मिळावायचं तर झाली थोडी निसर्गाच्या वैभवाची नासाडी, तर बिघडलं कुठं? असा विचार करून (किंवा हा विचारही मनात न आल्याने) कलशरूपानं प्रतिष्ठापना केलेल्या देवीच्या समोर पाच प्रकारची फळं ठेवायची. अशा प्रकारे पाच प्रकारची फळं उपलब्ध करून देण्यासाठी आपले व्यापारी बंधू व्रतकरी भगिनींच्या मदतीसाठी ठिकठिकाणी तत्परच असतात. पाच फळं एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून त्याचं ‘पॅकेज’ तयार ठेवतात आणि एरव्हीपेक्षा दीडपट किमतीला विकतात. सुटी फळ आणि फुलांच्या किमतींनी तर मार्गशीर्ष महिन्यात (त्यातल्या त्यात व्रताच्या आदल्या दिवशी, बुधवारी) उच्चांक गाठलेला असतो. वैभव प्राप्त होणार, तर त्यासाठी थोडा-अधिक खर्च नको का करायला? (यात एक मात्र नक्की होतं की फळा-फुलांच्या व्यापा-यांना व्रत न करताही वैभव मिळतं!) खर्चात काटकसर करायची तर थोडी काळी पडलेली केळी आणि जराशी किडलेली बोरंही चालवून घ्यायची. देवीला कुठं कळतो हा बार‘कावा’? ती फक्त फळं बघणार आणि वैभव देणार. आणि जरी तिच्या लक्षात आलं की ही फळं काही तितकीशी चांगली नाहीत, तरी ती ग्राहक मंचाकडे थोडीच तक्रार करणार! फार तर व्यापा-याला शिक्षा करायचा विचार करेल; पण हे व्यापारीही लक्ष्मीपूजन करून तिला खूश करत असतातच! व्रत संपन्न झालं की त्यात वापरलेल्या झाडांच्या फांद्या, फळं, पूजेच्या गोष्टी वाहत्या पाण्यात विसर्जित करायच्या असतात. कुजलेल्या फळा-फांद्यांनी पाणी प्रदूषित झालं की, मग वैभवलक्ष्मी जणू धन्य होते. वैभवलक्ष्मी व्रताची पोथी बाजारात सहज विकत मिळते. व्रतवैकल्यामुळे वैभव नेमकं कसं प्राप्त होणार, हे त्यात नसलं तरी व्रताची फलश्रुती म्हणजे -यांते खुणावतात. कारण सर्वानाच मिळेल त्या सोप्या ‘शॉर्टकट’नं झटपट श्रीमंत व्हायचं असतं. व्रत करणा-यांची संख्या वाढावी म्हणून व्रताची नवीन पोथी दरवर्षी घ्यावीच लागते आणि ते वाण दिलेल्या बाईला पुढच्या वर्षी व्रताचं पालन करावंच लागतं. (मल्टी लेव्हल मार्केटिंग!) व्यापा-यांप्रमाणेच पोथी छापणा-यांनाही ‘व्रताचा प्रसार करण्याचं पुण्यकर्म केल्यामुळे’ वैभवप्राप्ती होते हे मात्र नक्की! व्रताचं उद्यापन करायचं म्हणजे आणखी धार्मिक कर्मकांड आलं. 

जातीसाठी पोटच्या पोरीला माती

जातीतल्या जातीत लग्न करणारी मुलगी ही मर्यादाशील, आदर्श वगैरे तर जाती-धर्माबाहेरचा जोडीदार शोधणारी कुळबुडवी कार्टी ठरते. तिच्याबरोबर कायमचे संबंध तोडण्यापासून ते तिला ठार मारण्यापर्यंतच्या प्रतिक्रिया उमटतात याचं कारण स्त्रीवरच्या मालकी हक्काची मानसिकता हेच आहे.


imageआपल्याला आवडलेल्या तरुणाची लग्नासाठी केलेली निवड आणि वडिलांनी पसंत केलेल्या मुलाला दिलेला नकार साता-यातल्या आशा शिंदेच्या जीवावर बेतला. नोकरीच्या निमित्ताने पुण्यात राहणा-या या तरुणीची तिच्या जन्मदात्याने त्यांच्या घरातच हत्या केली. ही परवाचीच गोष्ट. आपल्याच रक्ता-मांसाच्या मुलीला गळा घोटून, विहिरीत ढकलून, विष देऊन, गळफास लावून मारण्याच्या घटना आपल्याला नवीन नाहीत. स्त्री ही एक खासगी मालमत्ता आहे, या मानसिकतेतून कौटुंबिक हिंसेचे हे आविष्कार वारंवार प्रत्ययाला येत असतात. त्यातही ज्या लेकीला वाढवण्यासाठी रक्ताचं पाणी करायचं तिच्याच जीवावर उठायचं, असं राक्षसी कृत्य करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. आताच्या या घटनेत कहर म्हणजे आशाच्या बापाने हा भयंकरगुन्हा ठरवून केल्याची निर्लज्ज कबुली स्वत: पोलिसांना दिलीय. कुटुंबाची इभ्रत आणि जाती-धर्माच्या संकल्पना हे आपल्याकडील एक विखारी वास्तव असल्याचंच यातून पुन्हा एकदा समोर आलं आहे. जातींच्या उच्चनीचतेची दृढमूल झालेली संकल्पना, त्यासंबधीची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. कारण या जन्माधिष्ठित जातीमागे कसलाही वैज्ञानिक दृष्टिकोन नाही. बुध्दीला पटेल असं कोणतंही तर्कशास्त्र नाही. या जातीचं तथाकथित पावित्र्य राखण्यासाठी पुरूषप्रधान समाजानं नेहमीच स्त्रियांचा माध्यम म्हणून वापर केला.
  ‘वै-याच्या रातीनं’ दिलं जगण्याचं बळ........


वयाच्या अठराव्या वर्षी सुनीता कोंडबत्तुनवार यांचं लग्न झालं. त्यानंतर विसाव्या वर्षी पतीचं कर्करोगानं निधन झालं. लग्नापूर्वी पतीला कर्करोग असल्याची माहिती त्यांच्यापासून सासरकडच्या मंडळींनी लपवली होती. विश्वासाच्या नात्याची सुरुवातच अविश्वासानं झाली होती. मात्र, पतीच्या मृत्यूनंतर छोट्या श्रुतिकाला घेऊन सासरकडच्या मंडळींना दोष देऊन, माहेरचा आसरा घेणं सुनीता यांना मंजूर नव्हतं.


imageस्त्रीवादी लेखनाविषयी चर्चा होत असताना महिलांचे वैयक्तिक संघर्ष आणि सोसलेपणाचीच चर्चा अधिक होते. निदान लेखकाकडून तशी अपेक्षा तरी केली जाते. बंडखोर स्त्रीवादी लेखनातही लेखिकेच्या वैयक्तिक संघर्षाचे पैलू रेखाटले जातात. विदर्भातील चंद्रपूर या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील सुनीता कोंडबत्तुनवार या लेखिकेच्या बाबतीत मात्र स्त्रीवादाचे हे परंपरागत पैलू तोकडे पडतात. पतीच्या मृत्यूनंतर समाजातील प्रस्थापित व्यवस्था आणि कुटुंबाकडून मिळालेल्या उपेक्षेतून जगण्याचं बळ एकवटणा-या कोंडबत्तुनवार यांच्या लेखनातून निसर्ग व स्त्रीमनाचे अंतरंग उलगडत जातात. मात्र त्यामुळेच लेखनातून येणारी सहनशीलता सोसलेपणाकडे न झुकता स्त्रीवादी संघर्षाला कारण झाली. या संघर्षातूनच स्वत:सह मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी करण्यात येणा-या प्रयत्नांना ताकद मिळाली.
 ‘चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील लोकसाहित्याचे संकलन’ याविषयी सादर केलेल्या प्रबंधावर सुनीता कोंडबत्तुवार यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. विदर्भ साहित्य मंडळाच्या त्या सदस्य आहेत. आज त्यांची मुलगी श्रुतिका कोंडबत्तुवार-सिंग या पुरुषांचीच मक्तेदारी मानल्या जाणा-या ‘मॅकेनिकल इंजिनीअर’ या पदावर अमेरिकेतील एका कंपनीत कार्यरत आहेत. प्रस्थापित मक्तेदारीला आव्हान देऊन त्यावर विजय मिळवण्याची कला श्रुतिकानेही आईकडूनच आत्मसात केली आहे.
 वयाच्या अठराव्या वर्षी सुनीता कोंडबत्तुनवार यांचं लग्न झालं. त्यानंतर विसाव्या वर्षी पतीचं कर्करोगानं निधन झालं. लग्नापूर्वी पतीला कर्करोग असल्याची माहिती त्यांच्यापासून सासरकडच्या मंडळींनी लपवली होती. विश्वासाच्या नात्याची सुरुवातच अविश्वासानं झाली होती. मात्र, पतीच्या मृत्यूनंतर छोट्या श्रुतिकाला घेऊन सासरकडच्या मंडळींना दोष देऊन, माहेरचा आसरा घेत सहानुभूतीवर आयुष्य काढणं सुनीता यांना मंजूर नव्हतं. याबदल्यात जगण्याचा अटळ संघर्ष, प्रस्थापित समाजाची संकुचित मानसिकता आणि सासरकडून होणारी कौटुंबिक अवहेलना पदरात पडणार होती. अशा स्थितीत सास-यांकडून मिळणारं मानसिक बळ ही एकच गोष्ट आशेचा किरण दाखवणारी होती. पण सहा वर्षात हा किरणही मावळला.

कल्पकतेला मेहनतीची जोड

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story
कोणत्याही ऑटोमोबाइल उत्पादनांचं छायाचित्रण करणं ही तशी खर्चिक बाब आहे. अ‍ॅक्शन ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी छायाचित्रण करणारी श्रद्धा कडाकिया ते कमी खर्चात आणि अचूकतेने करते. शास्त्रशुद्ध प्रशिक्षणानंतर श्रद्धाने छायाचित्रणासाठी फॅशन किंवा चंदेरी दुनियेसारख्या ‘लाइम लाइट’खाली असणा-या क्षेत्रांची निवड न करता यंत्रासारख्या अवजड क्षेत्राची केली. त्या क्षेत्रात अमीट ठसा उमटवला. अ‍ॅक्शन-ऑटोमोबाइल इंडस्ट्रीतली महिला छायाचित्रकार म्हणून श्रद्धा कडाकियाची ही भरारी थक्क करून टाकणारी आहे.
imageगुगल सर्च इंजिनवर ‘भारतातल्या नामवंत अ‍ॅक्शन ऑटोमोबाइल फोटोग्राफर्सची यादी’ असं इंग्रजीतून टाका.  आपल्यासमोर अमोघ ठाकूर, शशी नायर, हरदेश धिंग्रा, केदार मालेगावकर, अशी लंबी चौडी फोटोग्राफर्सची यादी त्यांच्या वेबसाइट्ससहित समोर येते. त्या यादीतलं एकच नाव आपलं लक्ष वेधून घेतं.  ते आहे श्रद्धा कडाकियाचं. ऑटोमोबाइल  क्षेत्रासाठी छायाचित्रण करणारी एकमेव महिला छायाचित्रकार. कुतूहलापोटी तिच्या वेबसाइटवर क्लिक केलं जातं. त्यावरचे तिने काढलेले फोटो पाहताना थक्क व्हायला होतं. 
 
गुजराथी त्यातही पारंपरिक विचार जोपासणा-या कुटुंबात जन्मलेल्या श्रद्धाचा कल लहानपणापासूनच इतरांपेक्षा वेगळं करण्याकडे होता. त्यामुळेच तिने आजच्या घडीला स्वत:ची ‘जस्ट क्लिक’ ही अ‍ॅड एजन्सी उभी केली आहे. छायाचित्रणाच्या कलेसाठी आवश्यक असलेली जगातील सर्व अत्याधुनिक साधनं आजच्या घडीला  तिच्याकडे उपलब्ध आहेत. या साधनांच्या मदतीनेच ती कोणत्याही ऑटोमोबाइल उत्पादनांची जाहिरात आत्मविश्वासाने करते. विक्रेत्याला त्याच्या उत्पादनातलं जे वैशिष्टय़ ग्राहकांपर्यंत पोहोचवायचं असतं ते ती त्याच्या अपेक्षेप्रमाणे पोहोचवते. कसं काय तिने छायाचित्रणातलं ‘अ‍ॅक्शन ऑटोमोबाइल फोटोग्राफी’ हे क्षेत्र निवडलं? त्या मागाची प्रेरणा काय होती?