भारतीय संविधानाच्या अनुच्छद 1 अन्वये संघराज्याचे नाव इंडिया अर्थात भारत असे असूनही पूर्वि व सद्याही हिंदूत्ववादी विचारसरणी सर्वोच्चस्थानी मानणारे संघराज्य ""हिंदूस्थान'' म्हणूनच संबोधतात. दिल्ली/राजच्या क्षेत्रात मंत्री म्हणून शपथ घेतांना भारतीय संविधान जे कायद्य़ाव्दारे स्थापित झाले त्यानुसार शपथ घेतात, परंतु कार्यपध्दतीचा अवलंब करताना त्यांना भारत या सर्वसमावेषक शब्दाचा विसर पडून स्वत:

भारत या शब्दाला फार मोठा इतिहास आहे, कारण पूर्वी समाज हा टोळी टोळीने राहत असे त्यापैकी भारत, तुर्वाष, दृष्य, यदू, पुरू आणि अनु ह्या टोळ्या होत्या असे ऋग्वेदात देखील पहावयास मिळते. सुदासाचा बाप दिवोदास याला भारत लोकांचा माणूस म्हणत असत. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत या शब्द प्रयोगातील रचने बाबत ऋग्वेदातील पुराव्याचा आधार घेऊन त्याबाबत सखोल चिंतन करून संघराज्यास ऋषभाच्या 100 पुत्रापैकी वडील असणाऱ्या भरत याच्या नावावरून या अति सुंदर भूमिला भारत भूमी हे नाव मिळाले, हे सिध्द केले कारण थोर राजाच्या दैदिप्यमान कुळात शुद्र सुदास याचा जन्म झालेला होता हे बाबासाहेबांनी शुद्रापूर्वी कोण होते या त्यां

हिंदू ग्रंथानूसार वर्णव्यवस्था अस्तित्वात असतांना समानता कशाला म्हणतात याची बाराखडी प्रमाणे तोंड ओळख करून घेण्याची आवश्यकता देखील कुणाला वाटली नाही, त्यामुळे ते जे वर्तन करतील तीच पूर्व दिशा ठरायची. गौतम धर्म सुमातील आध्याय 10 सुत्रे 50, 58, 59 आणि आध्याय 12, सुत्रेे 1-7 अन्वये समानता पाहणे जसा काही गुन्हाच ठरायचा. शुद्राने वरिल जातींची सेवाच करावी, त्याच्या मोबदल्यात जे मिळेल त्यावर त्याने गुजरान करावी. वरिष्ठ जातींनी खाऊ न जे अन्न शिल्ल्क राहिले असेल तेच अन्न शुद्रांनी खावे. एखाद्या वेळी जर शुद्राने त्रैवर्णिकातील लोकांची जाणून बुजून हेटाळणी कली किंवा त्यांना मारहान केलीतर शुद्रांचे अवयव छाटून टाकावेत, समानेतेच्या भावनेने शुद्र जर इतरांसोबत संभाषण करेल, किंवा रस्त्याने चाललेतर त्याला ठार मारावे अशा प्रकारच्या अज्ञा धर्मगं्रथात असायाच्या व त्यावेळी हिंदूधर्मग्रंथच प्रमाण असायचे.
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असमानतेवर आधारलेल्या सर्व धर्मग्रंथाचा धिक्कार करून भारतीय राज्य घटनेच्याअनुच्छेद क्रं . 14 अन्वये समानतेचा हक्क बहाल करून राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही. हे समानतेचे तत्त्व सर्वांना लागू केल्यामुळे कायद्यापुढे राजा व रंक दोन्ही सारखेच असाल्याचे सिध्द करून स्वत:चा जन्म दिनांक 14 व त्यातील 14 व्या रत्नाचे महत्त्व भारतीय नागरिकांना पटवून दिले.
हिंदूधर्मगंरथानूसार / शास्त्रानूसार वर्णव्यवस्थेचे समर्थन केलेले असल्यामुळे धर्म, वंश, जात, जन्मस्थान यामुळे उच्च निच्चयता पाळली जात असे त्यामुळे नागरिकांत भेदभाव असायचा सार्वजनिक स्थळे, पाणवठे, उपहारगृहे, सार्वजनिक करमणूकीची स्थाने, स्थाने, रस्ते, स्नानघाट इ. ठिकाणी नागरिकांस समानतेने, स्वातंत्र्याने नैसर्गिक नियमानूसार वावरण्यास, मुक्तपणे संचार करण्यास धर्मशास्त्रातील आज्ञेनूसार प्रतिबंध करण्यात आल्यामुळे मानवी प्रतिष्ठा पायदळी तुडविण्यात कर्मठ विचारवादी धन्यता मानीत असत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथील धर्मगं्रथाची री ओढणाऱ्या कर्मठांची नाहडी परिक्षा करुन भारतीय संविधानाच्या 15 अनुच्छेदाच्या माध्यमातून धर्म-वंश-जात-जन्मस्थान यास श्रेष्ठ समजणाऱ्यांच्या नाडीत अँटीबायोटीक औषधाचे इंजेक्शन दिल्यामुळे त्यांच्यातील विषाणूंचही वाढ खुंटवून कायद्यान्वये सार्वजनिक उपहारगृहे, विहिरी, तलाव, इतर पाणवठे, रस्ते, करमणूकीची स्थाने, दुकाने सर्व भारतीय नागरीकांसाठी खुले करून दिलेत. त्यामुळे खुलेआम होणार भेदभाव नष्ट होऊन भारतींय नागरीकांची मानवी प्रतिष्ठा वाढीस लागलेली आहे.
भारतीय भूमित अनेक संत, महात्मे, धर्मपारायण करणारे, धर्मग्रंथ निर्माते, धर्मसंस्थापक जन्मास आलेत संपूर्ण आयुष्य धर्म कार्यांत केल्याच्या स्मृती मागे निर्वाण पावले, परंतु त्यांचा उपदेश आत्मा आणि ईश्र्वर भक्तीच्या परिधा बाहेर न आल्याने त्यांची दृष्टी गांवकुसाबाहे राहणाऱ्या बहिष्कृतांवर होणाऱ्या अन्यायावर कधिच पडळीनाही, जर पडलीच असेल तर अपवादात्मक प्रसंगी व अपवादात्मक व्यक्तीच्या रूपाने आजही इतिहासाची पाने चालून पाहिली तर आन्यायााचा आलेख हा उंचावत गेल्याचे पुरावे जिवंतपणाची साक्ष देवून जातात. त्यामुळे बहिष्कार समाज हा नैसर्गीक दृष्टया जिवंत असूनही म्हतावस्थेत जीवन जगत होता. कारण त्यांना अस्पृश्य संबोधल्यामुळे त्यांचा इतर समाजांशी मानविय दृष्टीकोनातून संबंध तुटलेला होता. त्यामुळे तो समाज अस्पृश्यतेच्या साखळदंडाने जोखडून ठेवलेला होता, याच अस्पृश्य समाजात जन्मलेला डॉ. भिमराव रामजी आंबेडकर या महामानवाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद क्रं. 17 अन्वये भारतीय समाजाला अस्पृश्यतेची लागण झालेल्या मनावर कायमची जालीम औषधोपचार करून अस्पृश्यता पाळणे, तिचे समर्थन करणे इ. बाबतीत कायद्यानूसार शिक्षणास अपराधाची तरतूद करूनअस्पृश्यता कायमची नष्ठ केली त्यामुळे तर सद्य परिस्थितीत स्वत:स उच्च् वर्णीय समजणाऱ्याने एखाद्यास जातीवाचक शब्दाने अपमानीत केल्यास ऍट्रासिटी सारख्या कायद्याचा आधार घेवून त्यास निळ्या आभाळाकडे समानतेचे पाहाण्यचा दृष्टीकोन लक्षात आणून दिल्याने बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंंबेडकर व भारतीय संविधान यांचे मोठेपण लक्षात आल्यावाचून रहात नाही.
"मजहब वहि सिखाता आपसमें बैर रखना' याचा निश्चित असा अर्थ, धर्म एक दुसऱ्यात रामत्व पाहण्यासाठी शिकवित नाही असा होत असल्यामुळे धर्म म्हणजे काय? हे तपासून पाहण्यासाठी त्या धर्माचे तत्त्वज्ञान ज्या धर्मग्रंथात साठविलेले आहे व त्या तत्त्वज्ञानाच पकड सर्वसामान्य जनतेवर असल्याने ती जनता त्या धर्मग्रंथातील आज्ञे प्रमाणे एक दुसऱ्या सोबत जे वर्तन करते त्यावर निश्चितच अवलंबून आहे. धर्मएकमेकांत शमत्व ठेवण्यास शिकवित नाही असे मोघमपणाने जर ग्राहय धरले तर मग मनुस्मृती मधील आज्ञेव्दारे जेथे शुद्रांचे राज्य असेल तेथे राहूनच, आधार्मीक लोकांच्या मेळाव्यात राहू नये. अत्यंत लोकांपासून दूर दूर रहावे. शुद्राला बुध्दी विद्या ज्ञान देवू नये. त्याला उष्टेसुध्दा देवू नये किंवा यज्ञातील अन्न देवू नये, धर्मोपदेश करू नये. जर एखाद्या शुद्राने द्रोहवश जातीच्या नावाने कोेण्या ब्राम्हणाला काही म्हटलेतर अग्निमध्ये लाल केलेली दहाबोटे लांबीची सळई त्याच्या तोंडात घालावी. जर एखाद्या शुद्रगर्वोध्दत होवून ब्राम्हणांना धर्मोपदेश करण्याचा उध्दटपणा करतील तर राजोन त्याच्या तोेंडात व कानात उकळते तेल टाकून घ्यावे. अज्ञा प्रकाराच्य अमाानविध आज्ञा धर्मग्रंथात आचरणाता आणण्यासाठी का? म्हणून दिल्यात याबाबत आजतायागत कुणीही विचार केलेला दिसन नाही परंतु याच्या उलट, धर्मग्रंथातील आोप्रमाणे वागायचे व पोपटपंची प्रमाणे "मजहब नहि सिखात आपसमें बैर रखना' ही ओळ देखील गळाबसे पर्यंत आळवित रहायचे यातून एकच स्पष्ट होते की, शुद्र ही देखील मानसेच असून त्यांच्या सोबत मानवीय वृत्तीतून वागण्याचा धर्मगं्रथातील तत्त्वज्ञाने उपदेश केलेले दृष्टीस पडत नाही. धर्माचा उद्देश सर्व माणसे सुखी व्हावीत असा असून प्रत्येक व्यक्क्तीस धर्माप्रमाणे आचरण करुन सुज्ञ व्हावे असा असूनही धर्मग्रंथातून विशिष्ट समाजाचेे हित जोपासून इतरांवर अन्याय केल्याने ते अज्ञानी, निर्ध, धर्म असूनही धर्माप्रमाणे वागण्याची आज्ञा नसल्याने युगानुयुगे पाखंडी म्हणूनच जगळीत. याच समाजात निसर्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा युगपुरूष जन्माला घातला व नियतीचा खेळ खेळून त्यांच्याच हातून धर्मगं्रथाना प्रमाण न मानता देशाचे सर्वोत्तपरीने हित साधणारे भारतीय संविधान लिहून घेण्यात आले असून त्यातील अनुच्छेद क्रं . 25 प्रमाणे धर्मस्वातंत्र्याचा हक्क बहाल करून त्यान्वये सार्वजनीक सुव्यव्यस्था, नित्तीमता व आरोग्य यांच्या व या भागातील अन्य तरतुदीच्या अधिनतेने सद्सद्विवेक बुध्दीच्या स्वातंत्र्याला आणि धर्म मुक्तपणे प्रकट करण्याचा, आचरण्याच्या व त्याचा प्रचार करण्याच्या अधिकाराला सर्वच व्यक्ती सारखाच हक्कदार असल्याची देण दिलेली असून अनुच्छेद क्रं. 26 अन्वये सार्वजनिक सुव्यवस्था, नित्तीमता व आरोग्य यांच्या अधिनतेने प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्यंाच्या पैकी कोणत्याही गटास धार्मिक व धर्मदायी प्रयोजना करीता संस्थाही स्थापना करून त्या स्वखर्चाचे चालविण्याचा, धार्मिक बाबीमध्ये आपल्या व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचा हक्क बहाल केला आहे.
गतकाळात बऱ्याच चुका झाल्या आहेत कारण त्यावेळी सर्वांसाठी एकच आचारसंहिता असलेला, स्वातंत्र्य, समता, बंधुभावाने ओतप्रोत भरलेला ग्रंथ नव्हता, आज घडीला आपल्याकडे राजापासून तर रंकापर्यंत सर्वांना नैसर्गीक दृष्टीकोनातून समानतेने पाहणारा भारतीय संविधान हा गं्रथ आहे. तेव्हा प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे की, काळाच्या पडद्याआड गेलेल्या चुका विसरून जाऊन गीतकार शांताराम वाघमारे यांच्या कालच्या घडल्या, घडूनी दडल्या आज नको त्या चुका, रथा समतेचा हाका या गिताच्या ओळी अगदि मनापासून गुणगुणत राहिल्यास निश्तिच भारतीय माणसांची मने प्रसन्न राहून निर्मळ, स्वच्छंद पाण्याच्या प्रवाहा प्रमाणे प्रवाहीत राहतील........
-पट्टेबहादुर वसंत
No comments:
Post a Comment