इतिहासलेखन म्हणजेे केवळ घटनांची वा सनावळयांची जंत्री नव्हे, इतिहास म्हणजे घडलेल्या घटनांची सुसंगत मांडणी करणे आणि ही मांडणी अधिक वास्तवदर्शी करण्यासाठी विशिष्ट अशा सम्यक अन्वेषणपध्दतीची गरज असते. प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटील इतिहासलेखनाबाबत लिहितात संबंधित इतिहासविषयावर इतिहासाने किती संदर्भ पुस्तके अभ्यासली आहेत यावर त्याचे पांडित्य व अधिकार ठरविला जातो. ते आवश्यक

मार्क्सवादाने इतिहासाची मंाडणी ऐतिहासिक भौतिकवादाच्या आधाराने केली. खाजगी मालमत्तेच्या उदयापासून जगाचा इतिहास हा शोषक -

म. फुल्यांनी भारतीय ऐतिहासिक भौतिकवादाची मांडणी केली. त्यांच्या वर्णजातलक्षी अन्वेषणपध्दतीनुसार भारतीय इतिहासातील संघर्ष ब्राह्मणाची उच्चजाती व शुद्रातिशुद्र जातीजमाती यांचा राहिला आहे.
शरद पाटील यांनी मार्क्सची वर्गलक्षी अन्वेषण पध्दत व फुले - आंबेडकरांची वर्णजातलक्षी अन्वेषणपध्दत या दोघांनाही विधायक नकार देउन बहुप्रवाही अन्वेषणपध्दतीची मांडणी केली. या अन्वेषणपध्दतीच्या आधारे भारतात शोषण- शासनाच्या वर्गेतर संस्थाबाबत त्यांनी मांडणी केली. भारतीय ऐतिहासिक भौतिकवादाचे पुढील सुत्र त्यांनी मांडले. वसाहतपूर्व भारतीय समाजात वर्ग नावाची संस्था नव्हती. तर भारतीय सामंत शासक वर्ग लष्करी व पुरोहित जातींचा बनलेला होता तर शासित वर्ग हा शुद्र शेतकरी, कारूनारू जाती व जमाती यांनी बनलेला हेाता. त्यामुळे मध्ययुगीन भारतीय संघर्ष हा या दोन जातीगटांतील जातीसंघर्ष होता हे वास्तव शरद पाटील पुुढे आणतात.
ब्राह्मणी इतिहास लेखन प्रवाहाने मध्ययुगीन संघर्ष हा हिदूं- मुस्लिम यांच्यातील धार्मिक संघर्षाचा इतिहास आहे असे प्रतिपादन केले. मार्क्सवाद- फुले- आंबेडकरवाद प्रणित बहुप्रवाही अन्वेषण पध्दती मध्ययुगातील राजकीय संघर्षाचे स्वरूप हिंदू व मुस्लिम यांच्यातील धार्मिक व राजकीय संंघर्षाचे नाही हे वास्तव पुढे आणते. मध्ययुगीन भारतीय सामंत राज्यकर्त्यांचा सोपान हा स्थानिक लष्करी जात व ब्राह्मण यांपासून बनलेला होता. मध्ययुगातील प्रधान सत्ता ही तुर्कमुगलांची होती. तर या सत्तेचे दुय्यम स्तरावरील भागीदार हे स्थानिक लष्करी जात व ब्राह्मण हे होते मध्ययुगीन समाजातील प्रमुख संघर्ष शासक- शेाषक तुर्क - मोगल व ब्राह्मणवादी उच्चजाती एका बाजूला व त्यांच्या विरोधात शासित- शोषित हिंदू- मुस्लिम धर्मीय शेतकरी- कारागीर - शूद्रातिशूद्र जाती असा होता हे माफुआंचे प्रतिपादन आहे.
शरद पाटलांनी शिवाजीला एका बाजूला पुरोहित वर्ग वर्चस्वाविरोधात व दुसऱ्या बाजूला वतनदारांविरोधात द्याव्या लागलेल्या संघर्षाची मांडणी केली आहे.
सतीशचंद्र यांच्या मीडिव्हल इंडिया: सोसायटी, दि जागीरदारी क्रायसिस ऑफ दि व्हिलेज या ग्रंथाचा हवाला देउन शरद पाटील सांगतात की मोगल साम्राज्याचे अरिष्ट हे जातीव्यवस्थेचे अरिष्ट होते. मोगल साम्राज्य कोसळायचे कारण हे पडीत जमीनी अफाट असूनही स्थानिक बिगरशेतकरी जाती मिरासदार जातींच्या जातपंचायतीच्या परवानगीअभावी त्या जमीनी कसू शकत नव्हत्या. अशा काळात शिवाजीचे क्रांतीकार्य म्हणजे त्याने अस्पृश्य जाती व आदिवासी जमातींना शेतकरी जाती बनविले. ग्रॅंट डफ यांच्या महारट्टाज या ग्रंथाचा दाखला देउन ते लिहितात की कुणबी व मावळातील कोळी इ. आदिवासी शिवाजीच्या निशाणाखाली मराठा बनण्यासाठी जमा झाली. कोळयांना सांगण्यात आले त्यांनी अस्थायी शेती सोडून स्थीर शेती केली तर त्यांना मराठा कुणबी बनता येईल.
मध्ययुगात वतनदार हे रयतेकडून जमीन महसूल गोळा करून राजाकडे पेाहचवण्याचे काम करीत. शिवाजीने या वतनदारांना वेसण घालण्याचे काम केले असे शरद पाटील प्रतिपादीत करतात. वतनदारांनी रयतेला नागवू नये, जोरजुलूम करू नये यासाठी मलिकंबरने त्यांचेवर जरब बसवली होती. हे वतनदार ब्राह्मण वतनदारांशिवाय जनतेवर जुलूम करू शकत नसत. त्यामुळे मलिकंबरच्या कमी आकारणी असलेल्या जमीनधारापध्दतीच्या अंमलबजावणीतून वतनदार व ब्राह्मण वतनदार यांचे हितसंबंध धोक्यात आले हेाते असे समाजशास्त्रीय विश्लेषण शरद पाटील यंानी पुढे आणले आहे.
शिवाजीचे सैन्य हे बिगरशेतकरी जातींपासून बनले होते. शिवाजीच्या अभेद्य शक्ती असलेल्या किल्ल्यांवरील शिबंद्या अस्पृश्य - आदिवासींनी बनल्या होत्या. अतिशूद्र जातींना शेतकरी वा क्षत्रिय जाती बनवण्याची ही कृती वतनदार जातींच्या हितसंबंधांना व एकूणच जातिव्यवस्थेला तडे देणारी हेाती.
भारतीय समाजव्यवस्थेचा कालपट हा स्त्रीसत्ताक गणसमाज, वर्णसमाज, जातीसमाज ते जातवर्गसमाज असा स्थीत्यंतरीत झाला आहे हे शरद पाटलांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन आहेे. स्त्रीसत्ताक समाज पुरूषांनी अनियंत्रित होता. वर्णजातलिंगभेदविरहितता या समाजाचे वैशिष्टय होते. त्यामुळे स्त्रीप्राधान्यातच वर्णजातलिंगभेदविरहितता असत ही त्या काळात वर्णजातिसंस्थेला विरोध करण्यासाठी उदयाला आलेल्या तंत्र-पंथाची पायाभूत धारणा होती.
तंत्र हा वर्णजाती संस्थेच्या विरूध्द कार्यरत असलेला स्त्रीप्रधान आचारविचार पंथा होता. शिवाजीच्या जातीसंघर्षाची प्रेरणा ही तंत्रसाधनेच्या स्वीकारात होती. इ.स.च्या 6 व्या शतकात जातिव्यवस्थेने अधिक कर्मठ रू धारण केले असतांना तंत्र पंथाने वैदिक धर्माविरोधी जोरदार प्रचाराची भूमिका घेतली होती. शिवाजी बहजून जातींबद्दल व स्त्रियांबद्दल कळवळा दाखवू शकला हे या अब्राह्मणी धर्मांतरामुळेच असे मत शरद पाटील व्यक्त करतात.
शिवाजीचा जातिव्यवस्थेविरोधी संघर्ष सुधारित मालिकांबरी धारा लागू ेली हेाती. तेव्हापासून सुरू झाला होता. या संघर्षाची परिणती ही अंतिमत: शिवाजीच्या शाक्त राज्याभिषेकात झाली. हा राज्याभिषेक म्हणजे सजातीय विवाहाप्रमाणे एक विधी नव्हता तर अब्राह्मणी जात्यंतक शाक्त धर्म स्वीकारण्याची दीक्षा होती. विजातीय विवाह करूनच या पंथाची दिक्षा घेतली जात असे. शाक्त राज्याभिषेकाचा हा अन्वयार्थ शरद पाटील यांच्या प्राच्याविद्येतील पांडित्यामुळे लावू शकले. प्राच्यविद्येच्या अभावात गोविंद पानसऱ्यांसारखे अभ्यासक मात्र ब्राह्मणी इतिहासकारांच्या अन्वयार्थालाच पुष्टी देणारे अर्थ प्रतीत करतात.
प्रधान मंडळाच्या दहशतवादाला झुगारून शिवाजीने दुसरा राज्याभिषेक केला हेाता. राज्याभिषेकानंतरच छ. शिवाजी जातिव्यवस्थेविरोधातील संघर्ष तीव्र करू शकते. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा बाळगतो हे प्रभावळीच्या ब्राह्मण सुभेदाराला पाठविलेल्या पत्रातील आव्हानपर वचन हे शाक्त राज्याभिषेकापूर्वीचे नाही. या राज्याभिषेकापूर्वी शिवाजीला ब्राह्मण अदंडय मानणे भाग पडले होते हे त्याने प्रभावळीच्या सुभेदारास पाठविलेल्या राज्याभिषेकापूर्वीच्या पत्रावरून दिसते.
वर्णव्यवस्था व स्त्रीदास्यविरोधाची पंरपरा असलेल्या शाक्त तंत्रामुळे शिवाजीला ब्राह्मणी धर्माविरूध्द व जातिव्यवस्थेविरूध्द बंड करण्याची प्रेरणा मिळाली होती. उच्चजातीच्या दृष्टीने हा अक्षम्य गुन्हा होता व म्हणून सोयराबाईला हाताशी धरून शिवाजीवर विषप्रयोग केला गेला असे प्रतिपादन शरद पाटील करतात.
शरद पाटलांची शिवाजीच्या अब्राह्मणी संघर्षाची मांडणी ही माफुआंच्या राजकीय मांडणीला पूरक आहे. जात्यंतक क्राती ही वर्गांतक क्रांतीपेक्षाही कठीण आहे व ती प्रबोधनाच्या क्रांतीशिवाय अशक्य आहे हे प्रतिपादन आंबेडकरांप्रमाणेच माफुआंचे देखील आहे. भारतीय जात्यांतक लोकशाही क्रांतीची तयारी अब्राह्मणी प्रबोधन क्रांतीने करावी लागेल या भूमिकेतून शिवाजीच्या अब्राह्मणी संघर्षाचे महत्त्व शरद पाटील प्रतिपादीत करतात.
मागील वर्षी सबरंग या संस्थेतर्फे शिवाजी महाराजांवर तयार केलेले पाठयपुस्तक मुंबईतील काही शाळांमध्ये अभ्यासक्रमात होते. त्या पाठयपुस्तकाती शिवाजीच्या जातीसंघर्षाविषयक मांडणीवर आक्षेप घेउन व त्याचा उल्लेख शूद्र म्हणून केल्याबद्दल शिवसेनेने हिंसक आंदेालन केले होते. शिवसेनेचा आक्षेप हा शिवाजीच्या सर्वधर्मसमभावी भूमिकेला नव्हता तर जातीसंघर्षाला होता ! त्यामुळे शिवाजीला प्रतिक्रांतीकारी हिंदुत्ववाद्यांच्या तावडीतून सोडविण्यासाठीचे प्रबोधन शिवाजीच्या अब्राह्मणी संघर्षाच्या मांडणीतून होईल. उदारमतवाद्यांच्या परधर्मसहिष्णुवादी शिवाजी या सिमीत मांडणीतून नव्हे ! त्यामुळे शरद पाटील यांची मांडणी पानसरे व इतर सर्व उदारमतवाद्यांच्या मांडणीपेक्षा अधिक वास्तवदर्शी आहे आणि म्हणूनच सध्याची लोकशाही क्रांतीची कोंडी फोडणारी देखील!
दिलीप चव्हाण
No comments:
Post a Comment